IB Exams Cancelled: इंटरनॅशनल बॅकलॉरेट अर्थात IB बोर्डाने भारतातील बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. यामुळे राज्यातील आयबी मंडळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. भारतात बोर्डाशी संलग्न १८५ शाळा आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील शाळांमध्ये प्रवेश हवा असतो किंवा ज्यांच्या पालकांच्या परदेशात बदली होत असतात, अशा पालकांची मुले या बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेशाला प्राधान्य देतात.
केंद्रीय शिक्षण मंडळाने १०वीची बोर्डाची परीक्षा रद्द करून त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याच्या निर्णय घेतला आहे. याचबरोबर आता आयबी मंडळानेही असाच निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पालकांनी संबंधित शाळांशी चर्चा करावी अशी सूचना मंडळाच्या प्रवक्त्यांनी केली आहे. तर आयबी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कोर्सवर्कच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर विविध स्तरावर झालेले मूल्यांकन या आधारे अंतिम श्रेयांक देण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य अवगत झाले की नाही याची तुलना करून अंतिम श्रेयांक द्यावा, तसेच हा श्रेयांक का दिला याचे समर्थन करणारा अहवालही द्यावा असेही मंडळाने शाळांना सांगितल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
मूल्यांकन कसे?
भारतातील आयबी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे कोर्सवर्कचे गुण आणि मे २०२१ सत्राची संभाव्य श्रेणी त्यांना बहाल करण्यात येतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी त्यांच्या शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहन बोर्डाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
NEET PG 2021 परीक्षा लांबणीवर; नवी तारीख लवकरच
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा दोन जूनपासूनबारावीची परीक्षा लांबणीवर; व्यावसायिक अभ्यासक्रमांवर अनिश्चिततेचे सावट
केंद्रीय शिक्षण मंडळाने १०वीची बोर्डाची परीक्षा रद्द करून त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याच्या निर्णय घेतला आहे. याचबरोबर आता आयबी मंडळानेही असाच निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पालकांनी संबंधित शाळांशी चर्चा करावी अशी सूचना मंडळाच्या प्रवक्त्यांनी केली आहे. तर आयबी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कोर्सवर्कच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर विविध स्तरावर झालेले मूल्यांकन या आधारे अंतिम श्रेयांक देण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य अवगत झाले की नाही याची तुलना करून अंतिम श्रेयांक द्यावा, तसेच हा श्रेयांक का दिला याचे समर्थन करणारा अहवालही द्यावा असेही मंडळाने शाळांना सांगितल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
मूल्यांकन कसे?
भारतातील आयबी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे कोर्सवर्कचे गुण आणि मे २०२१ सत्राची संभाव्य श्रेणी त्यांना बहाल करण्यात येतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी त्यांच्या शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहन बोर्डाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
NEET PG 2021 परीक्षा लांबणीवर; नवी तारीख लवकरच
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा दोन जूनपासूनबारावीची परीक्षा लांबणीवर; व्यावसायिक अभ्यासक्रमांवर अनिश्चिततेचे सावट