दहावीची परीक्षा दिलेल्या आणि निकालाची (maharashtra ssc result 2022 update) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (FYJC Online Admission 2022) अखेर आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील विविध ज्युनियर कॉलेजांमधील अकरावीच्या र्गातील प्रवेशप्रक्रियेला आज, सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेद्वारे अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाइन नावनोंदणी करावी लागेल. २३ ते २७ मे केवळ सराव अर्ज भरून घेतले जातील. ३० मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होईल. शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. https://11thadmission.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी, अर्ज भरण्याचा सराव आणि मॉक डेमो नोंदणीकरिता २३ ते २७ मेदरम्यान मुदत देण्यात आली आहे. ज्युनियर कॉलेजे आणि उच्च माध्यमिक शाळांची नोंदणी तसेच माहितीची दुरुस्ती प्रक्रिया ३० मेपासून सुरू होईल आणि राज्य मंडळाच्या परीक्षांच्या निकालापर्यंत ही नोंदणी करता येईल. ऑनलाइन नोंदणी व अर्जाचा पहिला भाग भरण्यास ३० मे रोजी तर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास दहावीच्या निकालानंतर प्रारंभ होईल.
FYJC Online Admission च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
औरंगाबादमध्ये ऑफलाइन प्रवेश
दरम्यान, राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. शहरात अकरावीची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी देखील ऑनलाइन अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून औरंगाबाद जिल्ह्याला वगळण्यात आले होते. शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त तर, ग्रामीण भागात क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश होतात. त्यामुळे येथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विविध घटकांचा विरोध होता.
FYJC Online Admission च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
औरंगाबादमध्ये ऑफलाइन प्रवेश
दरम्यान, राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. शहरात अकरावीची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी देखील ऑनलाइन अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून औरंगाबाद जिल्ह्याला वगळण्यात आले होते. शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त तर, ग्रामीण भागात क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश होतात. त्यामुळे येथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विविध घटकांचा विरोध होता.