शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण
वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'मी कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे मला आजच कळले आहे. सोमवार सायंकाळपासून मला प्राथमिक लक्षणं आढळायला सुरुवात झाली. पण ही लक्षणं तुलनात्मक सौम्य आहेत.'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2021, 9:38 am
हायलाइट्स:
- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण
- सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
- लक्षणं तुलनात्मक सौम्य, तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना (Education Minister tested covid positive) करोनाची लागण झाली आहे. गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीच सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'मी कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे मला आजच कळले आहे. सोमवार सायंकाळपासून मला प्राथमिक लक्षणं आढळायला सुरुवात झाली. पण ही लक्षणं तुलनात्मक सौम्य आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे आणि मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी, हि विनंती.'
गेल्या काही दिवसात राज्यातली करोना संक्रमणग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. देशाच्या काही भागांत आणि राज्यात करोना तसेच ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. खबरदारी म्हणून काही कठोर निर्बंध लावले जात आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त
राज्यात सध्याच्या घडीला ओमायक्रॉनचे रुग्ण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलणे गरजेचे होते. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी केले आहेत.
जर लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच
राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तथापि घाबरण्याचे कारण नाही. पण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही सण आणि नवीन वर्षाचे स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचेही पालन करा. राज्यात आधी ५०० ते ६०० रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४००वर गेली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्णही १००च्या घरात आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसात राज्यातली करोना संक्रमणग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. देशाच्या काही भागांत आणि राज्यात करोना तसेच ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. खबरदारी म्हणून काही कठोर निर्बंध लावले जात आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त
राज्यात सध्याच्या घडीला ओमायक्रॉनचे रुग्ण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलणे गरजेचे होते. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी केले आहेत.
जर लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच
राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तथापि घाबरण्याचे कारण नाही. पण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही सण आणि नवीन वर्षाचे स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचेही पालन करा. राज्यात आधी ५०० ते ६०० रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४००वर गेली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्णही १००च्या घरात आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.