पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. राज्य मंडळाने २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत दहावीची परीक्षा ५ हजार ३३ केंद्रांवर घेतली होती. निकाल आज दुपारी १ वाजता वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांन बोर्डानं जाहीर केलेल्या वेबसाइटवर जाऊन विषयनिहाय गुणांची मुद्रित प्रत घेता येईल
गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी काय करायचं?
बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुरवणी परीक्षेसाठी ७ जूनपासून नोंदणी
पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली
या वेबसाइटवर पाहा निकाल
https://mahresult.nic.in, https://ssc.mahresults.org.in, http://sscresult.mkcl.org या वेबसाइटद्वारे निकाल पाहता येईल.
निकालाच्या ठळक बाबी
दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,४१,६६६ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,२९,०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,३४,८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.११ % ) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ( ९२.०५%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८२ ने जास्त आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे ९५.६४, नागपूर ९२.०५, औरंगाबाद(छत्रपती संभाजीनगर) ९३.२३, मुंबई ९३.६६, कोल्हापूर ९६.७३, अमरावती ९३.२२, नाशिक ९२.२२, लातूर ९२.६७, कोकण ९८.११ टक्के निकाल जाहीर लागला आहे.गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी काय करायचं?
बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुरवणी परीक्षेसाठी ७ जूनपासून नोंदणी
पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली
या वेबसाइटवर पाहा निकाल
https://mahresult.nic.in, https://ssc.mahresults.org.in, http://sscresult.mkcl.org या वेबसाइटद्वारे निकाल पाहता येईल.
निकालाच्या ठळक बाबी
दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,४१,६६६ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,२९,०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,३४,८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.११ % ) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ( ९२.०५%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८२ ने जास्त आहे.