BalBharti Book Error: मुंबईच्या बीएमसी संचालित मुंबई पब्लिक स्कूलमध्ये (एमपीएस) दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरव शुक्ला या विद्यार्थ्याने त्याच्या पुस्तकात मोठी चूक शोधून काढली आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. गौरवने दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील चूक शोधली आणि त्याबद्दल माहिती दिली. गौरवच्या दूरदृष्टीमुळे, राज्य पाठ्यपुस्तक ब्युरो बालभारतीने पुस्तकातील त्रुटी दूर करून त्यांच्या पुस्तकाच्या पुढील छपाईमध्ये प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. साई बाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलचा १६ वर्षांचा विद्यार्थी गौरवला त्याच्या विज्ञान २ पुस्तकातील धडा ८ मधील पान क्रमांक ८१ वर अमिनो ऍसिडच्या चार्टमध्ये चूक लक्षात आली. एफ साउथ वॉर्ड (परळ) येथे असलेल्या या शाळेत शिकणारा गौरव म्हणतो, 'चार्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टींपैकी फक्त एक अमिनो अॅसिड होते. बाकीचे अमिनो अॅसिड नव्हते. जेव्हा मला हे समजले तेव्हा मी प्रथम माझ्या शिक्षकांशी बोललो आणि इंटरनेटवर संशोधन केले. विद्यार्थ्याने पुढे सांगितले की, 'माझी शाळा आणि वर्गशिक्षिका छाया शेळके मॅडम यांनी मला प्रोत्साहन दिले याचा मला आनंद आहे.'
शिवडी येथील रहिवाशी गौरवचे वडील टॅक्सी चालक आहेत. बालभारतीने चूक मान्य करण्यासोबतच त्यात सुधारणा करणार असल्याचेही सांगितले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढल्याचे गौरव सांगतो. गौरवला भविष्यात इंजिनीअरिंग करायचे आहे.यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक तीन वर्षांपासून वापरले जात आहे.
गौरवच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्राचार्य म्हणाले, 'तो इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता. त्या विषय शिक्षकाकडे चौकशी केली असता गौरव बरोबर असल्याचे कळले. मात्र बालभारतीची पुस्तके तज्ज्ञांच्या सल्लामसलत करून प्रकाशित केली जातात. आम्ही काय करायचं या संभ्रमात होतो, तोपर्यंत गौरवने स्वतःची तयारी केली होती, मग आम्ही त्याला साथ द्यायचं ठरवलं.
बालभारतीकडून गौरवचे अभिनंदन
गौरवने गेल्यावर्षी १७ डिसेंबरला बालभारतीला ईमेल पाठवला होता आणि २ फेब्रुवारीला त्याला उत्तर मिळाले होते. या उत्तरात बालभारतीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. उत्तरात म्हटले आहे की, 'ती चूक समितीच्या सदस्यांना दाखवण्यात आली. त्यांच्या अहवालानुसार तुम्ही ओळखलेला दोष योग्य आहे. पुस्तकाच्या पुढील छपाईमध्ये ती योग्यरित्या दुरुस्त केली जाईल.शिवडी येथील रहिवाशी गौरवचे वडील टॅक्सी चालक आहेत. बालभारतीने चूक मान्य करण्यासोबतच त्यात सुधारणा करणार असल्याचेही सांगितले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढल्याचे गौरव सांगतो. गौरवला भविष्यात इंजिनीअरिंग करायचे आहे.यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक तीन वर्षांपासून वापरले जात आहे.
गौरवच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्राचार्य म्हणाले, 'तो इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता. त्या विषय शिक्षकाकडे चौकशी केली असता गौरव बरोबर असल्याचे कळले. मात्र बालभारतीची पुस्तके तज्ज्ञांच्या सल्लामसलत करून प्रकाशित केली जातात. आम्ही काय करायचं या संभ्रमात होतो, तोपर्यंत गौरवने स्वतःची तयारी केली होती, मग आम्ही त्याला साथ द्यायचं ठरवलं.