Mumbai University Exams 2020: तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून सूरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले.
बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये असेही संचालक डॅा विनोद पाटील यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही: उदय सामंत
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, मात्र अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ये बोलत होते.
महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही: उदय सामंत
परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचं यात कोणतही नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे परीक्षा पुन्हा एकदापुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विशेष गट कार्यरत आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मुंबई विद्यापाठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक; आयडॉलचे पेपर लांबणीवर
दरम्यान ही यंत्रणा कोलमडून टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली. शिवाय, विरोधकांना काहीही काम नसून परीक्षांबाबत समस्या येत असली तरी याबाबत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये असेही संचालक डॅा विनोद पाटील यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही: उदय सामंत
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, मात्र अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ये बोलत होते.
महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही: उदय सामंत
परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचं यात कोणतही नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे परीक्षा पुन्हा एकदापुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विशेष गट कार्यरत आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मुंबई विद्यापाठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक; आयडॉलचे पेपर लांबणीवर
दरम्यान ही यंत्रणा कोलमडून टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली. शिवाय, विरोधकांना काहीही काम नसून परीक्षांबाबत समस्या येत असली तरी याबाबत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.