म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) प्रशासनाने आपले सर्वाधिकार वापरत दिलेला प्रवेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Tantra Education Minister Uday Samant) यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठातील बेकायदा प्रवेश रोखला गेला आहे. एम.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमाला (M.A. Psychology course) एका विद्यार्थिनीला नियमबाह्य प्रवेश (Unauthorized admission) दिल्याचे युवासेनेकडून उघडकीस आणण्यात आले होते. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कारवाईचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 'त्या' विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्या जागेवर योग्य विद्यार्थ्याला प्रवेश मिळणे शक्य होणार झाले नेपाळ देशातील काठमांडू येथील मेघा पुरी हिने पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. तिने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एम.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमासाठी २३ जून, २०२१ रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे 'परदेशी विद्यार्थी' असल्याचे सांगून अर्ज केला. मेघाने पदवी शिक्षण हे पुणे विद्यापीठातून पूर्ण केल्याने तिला 'परदेशी विद्यार्थी' या 'कॅटेगरी'खाली प्रवेश देता येत नाही, तरीही तसा अर्ज प्रवेशासाठी केला. तसेच एमए मानसशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पदवी अभ्यासक्रमामध्ये एक किंवा दोन मानसशास्त्रासंबंधी विषय असणे बंधनकारक आहे. मात्र तिने पदवी शिक्षणामध्ये तिचा मानसशास्त्राशी काहीही संबंध नसताना तिने एम.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. त्यामुळे विद्यार्थी विकास विभागाने ही विद्यार्थिनी अभ्यासक्रमास पात्र आहे का? याची पडताळणी करण्यासाठी तिचा अर्ज पात्रता व नावनोंदणी आणि स्थलांतर विभागाकडे पाठवला. या विभागाने २८ जून, २०२१ रोजी ही विद्यार्थिनी एम.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमास अपात्र असल्याचे कळवले होते.
तत्कालिन विभाग प्रमुख डॉ. सतीशचंद्र यांनीही २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी हा प्रवेश नियमबाह्य असल्याचे विद्यार्थी विकास विभागाला कळवले होते. या प्रवेशासाठी विद्यापीठाने एक समिती नेमली. या समितीने मुंबई विद्यापीठाचे व मानसशास्त्र विभाग प्रवेशाचे सर्व निकष डावलून या विद्यार्थिनीची ऑनलाइन बुद्धिमत्ता चाचणी घेण्याची शिफारस केली. त्यामध्ये ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली व तिला नियमानुसार शुल्क भरून प्रवेशही देण्यात आल्याचे युवासेना सहसचिव संतोष धोत्रे यांनी समोर आणले. युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, सहसचिव संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांच्या शिष्टमंडळाने पत्राद्वारे हे प्रकरण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना १५ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अखेर हा प्रवेश रद्द करण्यात आला.
काय म्हणते विद्यापीठ?
मेघा पुरी या विद्यार्थीनीने मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात प्रवेश मिळावा, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एक खिडकी प्रणालीमधून अर्ज केला होता. अर्जावर कार्यवाही करण्यासाठी पात्रता व नावनोंदणी आणि स्थलांतर विभागाकडे पाठवला. या विभागाने प्रचलित पद्धतीनुसार प्राथमिक स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून आणि विद्याशाखा बदल या अर्जावर प्रक्रिया सुरू असतानाच मेघा पुरीने विद्यापीठाकडे प्रवेशासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने समिती स्थापन केली. या समितीने मानसशास्त्र विभागाने या विद्यार्थीनीची विद्याशाखा बदलाबाबत बाबत परीक्षा घेऊन त्याचा अहवाल पात्रता व नावनोंदणी विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मानसशास्त्र विभागाने त्यांचा अहवाल पात्रता व नावनोंदणी विभागास सादर करत या विद्यार्थीनीला प्रवेश नियमानुसार मानसशास्त्र विद्याशाखा बदल परीक्षेस मान्यता देता येत नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे अंतिम प्रवेश नाकारण्यात आला आहे.
तत्कालिन विभाग प्रमुख डॉ. सतीशचंद्र यांनीही २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी हा प्रवेश नियमबाह्य असल्याचे विद्यार्थी विकास विभागाला कळवले होते. या प्रवेशासाठी विद्यापीठाने एक समिती नेमली. या समितीने मुंबई विद्यापीठाचे व मानसशास्त्र विभाग प्रवेशाचे सर्व निकष डावलून या विद्यार्थिनीची ऑनलाइन बुद्धिमत्ता चाचणी घेण्याची शिफारस केली. त्यामध्ये ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली व तिला नियमानुसार शुल्क भरून प्रवेशही देण्यात आल्याचे युवासेना सहसचिव संतोष धोत्रे यांनी समोर आणले. युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, सहसचिव संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांच्या शिष्टमंडळाने पत्राद्वारे हे प्रकरण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना १५ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अखेर हा प्रवेश रद्द करण्यात आला.
काय म्हणते विद्यापीठ?
मेघा पुरी या विद्यार्थीनीने मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात प्रवेश मिळावा, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एक खिडकी प्रणालीमधून अर्ज केला होता. अर्जावर कार्यवाही करण्यासाठी पात्रता व नावनोंदणी आणि स्थलांतर विभागाकडे पाठवला. या विभागाने प्रचलित पद्धतीनुसार प्राथमिक स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून आणि विद्याशाखा बदल या अर्जावर प्रक्रिया सुरू असतानाच मेघा पुरीने विद्यापीठाकडे प्रवेशासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने समिती स्थापन केली. या समितीने मानसशास्त्र विभागाने या विद्यार्थीनीची विद्याशाखा बदलाबाबत बाबत परीक्षा घेऊन त्याचा अहवाल पात्रता व नावनोंदणी विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मानसशास्त्र विभागाने त्यांचा अहवाल पात्रता व नावनोंदणी विभागास सादर करत या विद्यार्थीनीला प्रवेश नियमानुसार मानसशास्त्र विद्याशाखा बदल परीक्षेस मान्यता देता येत नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे अंतिम प्रवेश नाकारण्यात आला आहे.