म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महापालिका शाळेतील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसह हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळालेलीच नाहीत, पण त्याच बरोबर गणवेश देखील देण्यात आलेले नाहीत. दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना या विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश घालून यावे लागत आहे. महापालिकेने आर्थिक तरतूद केलेली असतानादेखील विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत पाठ्यपुस्तके आणि मोफत गणवेश दिला जातो. बालवाडीमधील विद्यार्थी आणि नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठराव करुन महापालिका फंडातून या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याचा निर्णय घेतला. दर वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यावर पहिल्या महिन्यातच अन्य विद्यार्थ्यांसोबत या विद्यार्थ्यांनादेखील पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिले जातात. यंदा मात्र अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही.
दिवाळीच्या सुट्टीनंतरचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. परंतु बालवाडी आणि नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश घालून शाळेत यावे लागत आहे. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना तर नवीन पुस्तकेदेखील मिळालेली नाहीत. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळण्याची शक्यता आहे. गणवेशाबद्दल मात्र अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार की जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांची बोलवण होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके लवकरच वितरीत केली जातील, पाठ्यपुस्तक महामंडळाकडून पुस्तके मिळणार आहेत. गणवेशाचा मुद्दा देखील लवकरच निकाली निघेल. काही तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देता आले नाहीत. आता त्यात आम्ही लक्ष घातले आहे.
संजीव सोनार, शिक्षणाधिकारी, महापालिका
महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत पाठ्यपुस्तके आणि मोफत गणवेश दिला जातो. बालवाडीमधील विद्यार्थी आणि नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठराव करुन महापालिका फंडातून या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याचा निर्णय घेतला. दर वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यावर पहिल्या महिन्यातच अन्य विद्यार्थ्यांसोबत या विद्यार्थ्यांनादेखील पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिले जातात. यंदा मात्र अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही.
दिवाळीच्या सुट्टीनंतरचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. परंतु बालवाडी आणि नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश घालून शाळेत यावे लागत आहे. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना तर नवीन पुस्तकेदेखील मिळालेली नाहीत. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळण्याची शक्यता आहे. गणवेशाबद्दल मात्र अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार की जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांची बोलवण होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके लवकरच वितरीत केली जातील, पाठ्यपुस्तक महामंडळाकडून पुस्तके मिळणार आहेत. गणवेशाचा मुद्दा देखील लवकरच निकाली निघेल. काही तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देता आले नाहीत. आता त्यात आम्ही लक्ष घातले आहे.
संजीव सोनार, शिक्षणाधिकारी, महापालिका