Offline Classes: करोना प्रादुर्भावामुळे (Covid19) गेल्या २ वर्षांपासून शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद (School, College, Education Institute) होत्या. ही स्थिती केवळ भारतातच नव्हे तर परदेशात दिसत होती. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर (Students Mental Health) याचा परिणाम होत होता. विद्यार्थी आपल्या मित्र परिवाराला भेटू शकत नव्हते, मैदानी खेळ खेळू शकत नव्हते, अभ्यासासाठी प्रत्यक्ष संवाद साधू शकत नव्हते. यामुळे त्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागत होते. पण आता ऑफलाइन वर्ग (Offline Classes) सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. एका सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. करोना काळात सर्व ठिकाणचे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासाच्या माध्यमातून आपला अभ्यास पूर्ण करत होते. यंदा परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर आणि करोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याने ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. आता विद्यार्थी शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात जाऊन त्यांच्या वर्गाला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यात बरीच सुधारणा होताना दिसत आहे. किंबहुना दोन वर्षे घरात बंदिस्त राहिल्याने त्याच्या मानसिक आरोग्यावर खूप विपरीत परिणाम झाला होता.
भारतीय विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
करोना प्रादुर्भावामुळे सर्व काही बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. त्यांना ऑफलाइन क्लासेसचा अनुभव मिळत नव्हता, त्यामुळे त्यांचा योग्य विकास होऊ शकला नाही. शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी चेगकी (Chegki) ने ग्लोबल स्टुडंट सर्व्हे २०२२ केला. त्यानुसार, तीन चतुर्थांश (७७ टक्के) भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, महामारीमुळे त्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा अनुभव घेता आला नाही.
कॅम्पसमध्येही काही आव्हाने
महाविद्यालय-विद्यापीठ सुरू झाल्यापासून त्यांचे मानसिक आरोग्य खूप सुधारले असे ५५ टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा ब्रेक आला आहे. अशा परिस्थितीत, कॅम्पस लाइफसह स्वतःचे संतुलित राखणे फार सोपे नाही. या काळात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय अशी प्रतिक्रिया चेगचे अध्यक्ष आणि सीईओ डॅन रोसेन्सविग यांनी दिली.
भारतीय विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
करोना प्रादुर्भावामुळे सर्व काही बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. त्यांना ऑफलाइन क्लासेसचा अनुभव मिळत नव्हता, त्यामुळे त्यांचा योग्य विकास होऊ शकला नाही. शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी चेगकी (Chegki) ने ग्लोबल स्टुडंट सर्व्हे २०२२ केला. त्यानुसार, तीन चतुर्थांश (७७ टक्के) भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, महामारीमुळे त्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा अनुभव घेता आला नाही.
कॅम्पसमध्येही काही आव्हाने
महाविद्यालय-विद्यापीठ सुरू झाल्यापासून त्यांचे मानसिक आरोग्य खूप सुधारले असे ५५ टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा ब्रेक आला आहे. अशा परिस्थितीत, कॅम्पस लाइफसह स्वतःचे संतुलित राखणे फार सोपे नाही. या काळात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय अशी प्रतिक्रिया चेगचे अध्यक्ष आणि सीईओ डॅन रोसेन्सविग यांनी दिली.