राज्यातील विविध शासकीय विभागांमधील पदभरतीसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले आहे. असे पॅनेल स्थगित करण्याचा निर्णय १५ डिसेंबर २०२१ च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार यापुढे सर्व भरती परीक्षा या पॅनेलमधील कंपन्यांमार्फतच होतील. या पॅनेलमध्ये टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या कंपन्यांचा समावेश आहे. यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे. यापूर्वी २०१७ सालापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदांची पदभरती OMR पद्धतीने करण्यात येत होती. मात्र यापुढे पदभरतीसंदर्भातील कोणतीही परीक्षा पॅनेलबाहेरच्या OMR Vendors कडून घेण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश शासन आदेशात दिले आहेत.
अलीकडेच राज्यातील आरोग्य सेवा भरती परीक्षा, म्हाडा भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर हा परीक्षांच्या आयोजानाकरिता पॅनल निवडण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.
अलीकडेच राज्यातील आरोग्य सेवा भरती परीक्षा, म्हाडा भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर हा परीक्षांच्या आयोजानाकरिता पॅनल निवडण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.