म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. याबाबतचे एक पत्र मंडळाच्या वेबसाइटवर आले आहे. मात्र, करोना संसर्गस्थितीत या परीक्षांच्या प्रात्यक्षिकांची काय आवश्यकता, असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.
शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. याबाबत मंडळाने प्रशिक्षण आयोजित केले. मात्र त्यामध्येही शिक्षकांना बोलण्याची संधी न दिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते. यानंतर आता मंडळातर्फे या परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपात घेण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
लेखी परीक्षा २५ गुणांची आणि प्रात्यक्षिक परीक्षा २५ गुणांची घेण्यात येणार आहे. यामध्ये शारीरिक क्षमतेवर आधारित कोणतीही एक क्षमता, कौशल्याधिष्ठित शारीरिक क्षमता, विद्यार्थी पारंगत असलेल्या खेळाची अथवा उपलब्ध सांघिक खेळापैकी एका क्रीडा प्रकारातील कौशल्य, योगासने आणि प्राणायाम याच्या आधारे मूल्यमापन करावे असे सांगण्यात आले आहे. याशिवाय पुस्तक लेखन कार्याला पाच गुण देण्यात आले आहे.
१० जूनपर्यंत श्रेणी
या परीक्षांचे आयोजन शाळांनी त्यांच्या स्तरावर करून १० जूनपर्यंत मंडळाला श्रेणी सादर कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. तसेच या परीक्षा घेताना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून शारीरिक अंतर ठेवून गटागटाने घेण्यात याव्यात. तसेच क्रीडा साहित्यांचा सामूहिक वापर टाळावा, असेही यात सांगण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना घरून क्रीडा साहित्य आणण्याचे सूचित करावे, अशी सूचनाही केली आहे.
दहावी, बारावी परीक्षा: १७ नंबरचा अर्ज भरण्यास मुदतवाढ
आयोजन कधी करणार
२३ मेपर्यंत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू राहणार आहेत. यामुळे आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी या परक्षा घेणे शक्य नाही. तसेच नंतरही या परीक्षांचे आयोजन कसे करायचे असा प्रश्न शाळांतील मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांना पडला आहे. याचबरोबर या परीस्थितीत प्रात्यक्षिक परीक्षांचा आग्रह धरण्यापेक्षा लेखी परीक्षेचा पर्याय अधिक सक्षम करावा अशी मागणी पालक करत आहेत.
मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. याबाबतचे एक पत्र मंडळाच्या वेबसाइटवर आले आहे. मात्र, करोना संसर्गस्थितीत या परीक्षांच्या प्रात्यक्षिकांची काय आवश्यकता, असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.
शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. याबाबत मंडळाने प्रशिक्षण आयोजित केले. मात्र त्यामध्येही शिक्षकांना बोलण्याची संधी न दिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते. यानंतर आता मंडळातर्फे या परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपात घेण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
लेखी परीक्षा २५ गुणांची आणि प्रात्यक्षिक परीक्षा २५ गुणांची घेण्यात येणार आहे. यामध्ये शारीरिक क्षमतेवर आधारित कोणतीही एक क्षमता, कौशल्याधिष्ठित शारीरिक क्षमता, विद्यार्थी पारंगत असलेल्या खेळाची अथवा उपलब्ध सांघिक खेळापैकी एका क्रीडा प्रकारातील कौशल्य, योगासने आणि प्राणायाम याच्या आधारे मूल्यमापन करावे असे सांगण्यात आले आहे. याशिवाय पुस्तक लेखन कार्याला पाच गुण देण्यात आले आहे.
१० जूनपर्यंत श्रेणी
या परीक्षांचे आयोजन शाळांनी त्यांच्या स्तरावर करून १० जूनपर्यंत मंडळाला श्रेणी सादर कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. तसेच या परीक्षा घेताना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून शारीरिक अंतर ठेवून गटागटाने घेण्यात याव्यात. तसेच क्रीडा साहित्यांचा सामूहिक वापर टाळावा, असेही यात सांगण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना घरून क्रीडा साहित्य आणण्याचे सूचित करावे, अशी सूचनाही केली आहे.
दहावी, बारावी परीक्षा: १७ नंबरचा अर्ज भरण्यास मुदतवाढ
आयोजन कधी करणार
२३ मेपर्यंत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू राहणार आहेत. यामुळे आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी या परक्षा घेणे शक्य नाही. तसेच नंतरही या परीक्षांचे आयोजन कसे करायचे असा प्रश्न शाळांतील मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांना पडला आहे. याचबरोबर या परीस्थितीत प्रात्यक्षिक परीक्षांचा आग्रह धरण्यापेक्षा लेखी परीक्षेचा पर्याय अधिक सक्षम करावा अशी मागणी पालक करत आहेत.
मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार