Recession2K22: जागतिक मंदीचा परिणाम देशासह जगभरातील विविध मोठ्या कंपन्यांवर होताना दिसतोय. शिक्षण तंत्रज्ञान कंपनी BYJU ने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. बायजूस मार्च २०२३ पर्यंत मार्केटिंग आणि ऑपरेशनलवरील खर्च वाढवून फायदेशीर स्थितीत पोहोचण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनी पुढील सहा महिन्यांत पाच टक्के किंवा साधारण अडीच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनीच्या सह-संस्थापक दिव्या गोकुळनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी नवीन भागीदारीद्वारे परदेशात ब्रँड जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, ते भारत आणि परदेशातील व्यवसायासाठी १० हजार शिक्षकांना नियुक्त करेल. 'आम्ही संपूर्ण भारतात लक्षणीयरित्या ब्रँड जागरूकता निर्माण केली आहे. आम्ही आता मार्च २०२३ पर्यंत नफा मिळवण्याची योजना आखत आहोत. त्यासाठी आम्ही पर्याय शोधला आहे. या योजनेंतर्गत, मार्केटिंगचा बजेट वाढविला जाईल आणि खर्चाचे प्राधान्य निश्चित केले जाईल असे गोकुळनाथ यांनी म्हटले.
३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बायजूला ४ हजार ५८८ कोटी रुपयांचा तोटा झाला. महसूल वाढीसह शाश्वत वाढ सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया बायजूच्या इंडिया बिझनेसच्या मुख्य कार्यकारी मृणाल मोहित यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे अनेक महिने शाळा बंद राहिल्यामुळे मागणीत घसरण झाल्यानंतर BYJU'ने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
१० हजार शिक्षकांची नियुक्ती
"ही नवीन योजना आम्हाला कार्यक्षमता वाढवण्यास, टाळण्यास मदत करेल. आमचे हायब्रीड लर्निंग मॉडेल - 'ट्यूशन सेंटर' आणि आमचे 'ऑनलाइन लर्निंग मॉडेल' जे बायजूचे क्लासेस किंवा आमचे 'लर्निंग अॅप' आहे. विशेषतः, आम्ही आमच्या पहिल्या दोन उत्पादनांसाठी १० हजार शिक्षकांची नियुक्ती करण्याची योजना आखत असल्याचेही ते म्हणाले.३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बायजूला ४ हजार ५८८ कोटी रुपयांचा तोटा झाला. महसूल वाढीसह शाश्वत वाढ सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया बायजूच्या इंडिया बिझनेसच्या मुख्य कार्यकारी मृणाल मोहित यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे अनेक महिने शाळा बंद राहिल्यामुळे मागणीत घसरण झाल्यानंतर BYJU'ने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.