म. टा. प्रतिनिधी, नाशिक
देशात तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी; तसेच मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरवर्षी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) नुकतीच याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘एआयसीटीई’मार्फत प्रगती शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाराष्ट्रासह सर्व राज्यातील विद्यार्थिनींना गुणवत्तेच्या आधारावर ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. देशभरातील सर्व राज्यांमधील एकूण पाच हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दहावीच्या गुणांआधारे किंवा प्रवेश घेतानाच्या पात्रता गुणांवर ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने, आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा गरजू विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती उपयोगी पडणार असल्याचे ‘एआयसीटीई’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
६२४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती
या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबातील एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. अर्ज दाखल केल्यानंतर इन्स्टिट्यूटकडून अर्जांची पडताळणी करायची असून, त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) अर्जाची पडताळणी करून, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत कार्यवाही करता येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ६२४ विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व पात्र विद्यार्थिनींनाही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची अधिक माहिती आणि महत्त्वाच्या तारखा विद्यार्थिनींना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि ‘एआयसीटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशात तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी; तसेच मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरवर्षी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) नुकतीच याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने, आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा गरजू विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती उपयोगी पडणार असल्याचे ‘एआयसीटीई’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
६२४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती
या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबातील एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. अर्ज दाखल केल्यानंतर इन्स्टिट्यूटकडून अर्जांची पडताळणी करायची असून, त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) अर्जाची पडताळणी करून, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत कार्यवाही करता येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ६२४ विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व पात्र विद्यार्थिनींनाही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची अधिक माहिती आणि महत्त्वाच्या तारखा विद्यार्थिनींना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि ‘एआयसीटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.