अ‍ॅपशहर

महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही: उदय सामंत

करोना संसर्ग स्थिती योग्य नसल्याने शाळा-महाविद्यालये सुरू करता येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2020, 7:56 pm
महाराष्ट्रात कोविड-१९ स्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. करोना संसर्ग स्थिती योग्य नसल्याने शाळा-महाविद्यालये सुरू करता येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school reopening situation unsuitable for reopening schools colleges says maharashtra minister uday samant
महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही: उदय सामंत


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आढावा बैठकीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. मात्र, राज्याची परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय सुरू होणार नाहीत, अशी माहिती सामंत यांनी दिली.

केंद्र सरकारने अनलॉक - ५ अंतर्गत, देशातील शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात करोना संक्रमणाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे तूर्त तरी शाळा-महाविद्यालये बंदच राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवरच सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मार्च २०२० पासून लॉकडाऊनच्या वेळी बंद झालेली राज्यातील शाळा-महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. बहुतांश शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग क्लास ऑलाइन वर्ग घेत आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत केंद्राच्या गाइडलाइन्स जारी

महाराष्ट्रात सोमवारपर्यंत करोना संक्रमितांच्या संख्येने १४ लाख ५३ हजार ६५३ इतका टप्पा गाठला आहे तर आतापर्यंत ३८,३४७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

मुंबई विद्यापीठ 'आयडॉल' पदवी परीक्षांचे तीनतेरा; आजच्या परीक्षाही लांबणीवर

अकृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या; तसेच तांत्रिक कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तातडीने काही दिवसांत घेण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज