कोविड - १९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन पुकारला आणि देशातल्या सर्व शाळा बंद झाल्या. गेले चार महिने शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शाळा आता नेमक्या उघडणार कधी हा प्रश्न पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना सतावत आहे. तूर्त तरी शाळा सुरू आहेत, पण ऑनलाइन पद्धतीने. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले होतेत की कोविड - १९ महामारीची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर शाळा उघडतील.
आतापर्यंत मुंबई-पुण्यासह नवी दिल्ली, तामिळनाडू आणि अन्य अनेक शहरांमधील कोविड स्थिती सामान्य झालेली नाही. शाळा उघडण्याच्या राज्य सरकारांच्या भूमिकेला अनेक पालक संघटनांनी विरोध केला आहे. दिल्ली पॅरेंट्स असोसिएशनने पोखरियाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, '१६ मार्च रोजी जेव्हा शाळा बंद करण्याचे आदेश आले तेव्हा देशातल्या कोविड - १९ संक्रमित रुग्णांची संख्या शेकडोंमध्ये होती. आता ही संक्रमित रुग्णांची संख्या १० लाखांच्या पार गेली आहे. अशा काळात शाळा उघडणे हे हास्यास्पद आहे.' चालू वर्षीच्या बोर्ड परीक्षाही ऑनलाइन घेण्याची सूचना पॅरेंट असोसिएशनने केली आहे.
आसाम, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि गोवासारख्या राज्यांचा सप्टेंबर महिन्यापासून शाळा प्रत्यक्ष उघडण्याचा विचार आहे. मात्र या राज्यांतील शाळा उघडणार असतील तर त्या पूर्वीसारख्या पूर्णपणे उघडणार नाहीत. या नव्या 'न्यू नॉर्मल' स्थितीत खुले वर्ग, शाळेत प्रवेश करताना घ्यावयाची काळजी, वेगवेगळ्या सत्रात होणारे वर्ग आणि अशी अन्य काळजी घेतली जाणार आहे. आरोग्यविषयक आणि स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन केले जाणार आहे. एक दिवसाआड एकेक वर्ग अशा काही संकल्पनाही वापरल्या जाणार आहेत.
करोनामुळे कॉलेजे होताहेत बंद; दीड लाख जागा घटणार
अकरावी प्रवेशप्रकियेचा मनस्ताप मुख्याध्यापकांना
आंध्र प्रदेश सरकार ५ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याच्या विचारात आहे. तेथील मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तशा तयारीच्या सूचना दिल्या आहेत. पण या सर्व राज्यांमध्ये कोविड स्थिती सामान्य झाल्यानंतरच शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
आतापर्यंत मुंबई-पुण्यासह नवी दिल्ली, तामिळनाडू आणि अन्य अनेक शहरांमधील कोविड स्थिती सामान्य झालेली नाही. शाळा उघडण्याच्या राज्य सरकारांच्या भूमिकेला अनेक पालक संघटनांनी विरोध केला आहे. दिल्ली पॅरेंट्स असोसिएशनने पोखरियाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, '१६ मार्च रोजी जेव्हा शाळा बंद करण्याचे आदेश आले तेव्हा देशातल्या कोविड - १९ संक्रमित रुग्णांची संख्या शेकडोंमध्ये होती. आता ही संक्रमित रुग्णांची संख्या १० लाखांच्या पार गेली आहे. अशा काळात शाळा उघडणे हे हास्यास्पद आहे.' चालू वर्षीच्या बोर्ड परीक्षाही ऑनलाइन घेण्याची सूचना पॅरेंट असोसिएशनने केली आहे.
आसाम, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि गोवासारख्या राज्यांचा सप्टेंबर महिन्यापासून शाळा प्रत्यक्ष उघडण्याचा विचार आहे. मात्र या राज्यांतील शाळा उघडणार असतील तर त्या पूर्वीसारख्या पूर्णपणे उघडणार नाहीत. या नव्या 'न्यू नॉर्मल' स्थितीत खुले वर्ग, शाळेत प्रवेश करताना घ्यावयाची काळजी, वेगवेगळ्या सत्रात होणारे वर्ग आणि अशी अन्य काळजी घेतली जाणार आहे. आरोग्यविषयक आणि स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन केले जाणार आहे. एक दिवसाआड एकेक वर्ग अशा काही संकल्पनाही वापरल्या जाणार आहेत.
करोनामुळे कॉलेजे होताहेत बंद; दीड लाख जागा घटणार
अकरावी प्रवेशप्रकियेचा मनस्ताप मुख्याध्यापकांना
आंध्र प्रदेश सरकार ५ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याच्या विचारात आहे. तेथील मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तशा तयारीच्या सूचना दिल्या आहेत. पण या सर्व राज्यांमध्ये कोविड स्थिती सामान्य झाल्यानंतरच शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.