म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ‘तुमचा मुलगा अमूक इयत्तेत आहे, त्याचे पालक बोलता का, त्याला आमच्या शिकवणीकडे पाठवा’, असे सांगून शिकवणीबाबत (Private Classes) आग्रह धरण्याच्या अशा फोनने पालक सध्या वैतागले आहेत. पालकांचा मोबाइल नंबर, मुलाचे नाव, इयत्ता अशी इत्यंभूत संबंधितांकडे शाळा (School Provided Information) पुरवित असल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांच्या माहिती असे पुरविण्यावरून वादंग उभे राहले असून शिक्षण विभागाने (Education Department) मुख्याध्यापकांना सक्त ताकीद देत असे प्रकार थांबविण्याचे निर्देश दिले.
शाळांना सुट्टी लागतेय न तोच पालक, विद्यार्थ्यांना विविध खासगी शिकवणीचालकांकडून फोनद्वारे शिकवणी लावण्यासाठीचा आग्रह वाढला. विविध शिकवणीचालकांकडून पालकांना फोन येतो. मुलगा-मुलगी या इयत्तेत आहे, पुढे क्लासेसचे काय, आमच्याकडे अशा सुविधा, डेमो लेक्चरला पाठवा, ऑनलाइन, ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा असा भडिमार फोनद्वारे सुरू असतो. अशा फोन कॉल्सने अनेक पालक, विद्यार्थी वैतागले आहेत. विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संबंधितांकडे कशी असा प्रश्न पालक विचारू लागले.
नाव, नंबर, इयत्ता इथपासून ते परिसराचीही माहिती असते.अशा प्रकारची माहिती अशा खासगी शिकवणीचालकांकडे कशी हा विचार करुन पालकही गोंधळात पडले. औरंगाबाद शिक्षणाधिकारी कार्यालयाने याचे खापर शाळा व्यवस्थापन फोडले आहे. शाळांकडून अशा प्रकारची माहिती संबंधित संस्थांना पुरविली जाते. त्यामुळे ते अशा प्रकारचे कॉल्स करून शिकवणी लावण्याचा आग्रह धरत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र पाठवित अशा प्रकारची माहिती न देण्याचे स्पष्ट केले. अनेक मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालय अन् मुख्याध्यापक यांच्यात माहिती देण्याचा मुद्दा वादाचा बनला आहे, परंतु या सगळ्यात पालकांसमोर माहिती कोठून फुटली, असा प्रश्न कायम आहे.
शिक्षण विभागाने काय म्हटले आहे?
शाळेत प्रवेश घेताना शाळा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून विद्यार्थी, पालक यांची वैयक्तिक माहिती प्रवेश अर्जावर भरून घेण्यात येते. प्रवेश अर्जावरील माहिती व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांआधारे शाळांना विद्यार्थी, पालकांकडून माहिती देण्यात येते. असे निदर्शनास आले आहे की, इयत्ता दहावी, अथवा इयत्ता अकरावीत प्रविष्ट विद्यार्थ्यांना व पालकांना वेगवेगळ्या एजन्सीकडून एखाद्या शाळेत, क्लासमध्ये प्रवेश घेण्यासविषयी भ्रमणध्वनीवरून विचारणा करण्यात येते. त्यासंबंधाने वारंवार संपर्क करण्यात येतो. तपशीलात जावून विचारणा केली असता संबंधित पालकाचा भ्रमणध्वनी क्रमांक शाळेकडून पुरविल्याचे निदर्शनास येते. विद्यार्थी व पालकांनी शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती ही केवळ शाळेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हेतुसाठी दिलेली असते. त्यामुळे अशी माहिती इतर कुणालाही उपलब्ध करून देता येत नाही. यापुढे अशा प्रकारे विद्यार्थ्याचे नाव, जात, जन्मदिनांक वैयक्तिक माहिती संबंधित पालकाच्या परवानगीशिवाय परस्पर पुरविण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
शाळांकडून अशा प्रकारची माहिती दिल्याचे निदर्शनास येते. विद्यार्थी, पालकांनी शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती ही केवळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हेतुसाठी दिलेली असते. त्यामुळे शाळांनी परस्पर माहिती पुरवू नये, खबरदारी घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.
काही शाळांकडून असे प्रकार होतात, परंतु शिक्षण विभाग शाळांना दोषी धरत असले तरी हे प्रमाण नगण्य आहे. शिक्षण मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जावर मोबाइल नंबर जेव्हापासून घेत आहे, तेव्हापासून हे प्रकार वाढले आहेत. मंडळाकडूनच विद्यार्थी, पालकांचे नंबर फुटण्याची शक्यता जास्त असल्याचे मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल यांनी म्हटले.
शाळांना सुट्टी लागतेय न तोच पालक, विद्यार्थ्यांना विविध खासगी शिकवणीचालकांकडून फोनद्वारे शिकवणी लावण्यासाठीचा आग्रह वाढला. विविध शिकवणीचालकांकडून पालकांना फोन येतो. मुलगा-मुलगी या इयत्तेत आहे, पुढे क्लासेसचे काय, आमच्याकडे अशा सुविधा, डेमो लेक्चरला पाठवा, ऑनलाइन, ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा असा भडिमार फोनद्वारे सुरू असतो. अशा फोन कॉल्सने अनेक पालक, विद्यार्थी वैतागले आहेत. विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संबंधितांकडे कशी असा प्रश्न पालक विचारू लागले.
नाव, नंबर, इयत्ता इथपासून ते परिसराचीही माहिती असते.अशा प्रकारची माहिती अशा खासगी शिकवणीचालकांकडे कशी हा विचार करुन पालकही गोंधळात पडले. औरंगाबाद शिक्षणाधिकारी कार्यालयाने याचे खापर शाळा व्यवस्थापन फोडले आहे. शाळांकडून अशा प्रकारची माहिती संबंधित संस्थांना पुरविली जाते. त्यामुळे ते अशा प्रकारचे कॉल्स करून शिकवणी लावण्याचा आग्रह धरत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र पाठवित अशा प्रकारची माहिती न देण्याचे स्पष्ट केले. अनेक मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालय अन् मुख्याध्यापक यांच्यात माहिती देण्याचा मुद्दा वादाचा बनला आहे, परंतु या सगळ्यात पालकांसमोर माहिती कोठून फुटली, असा प्रश्न कायम आहे.
शिक्षण विभागाने काय म्हटले आहे?
शाळेत प्रवेश घेताना शाळा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून विद्यार्थी, पालक यांची वैयक्तिक माहिती प्रवेश अर्जावर भरून घेण्यात येते. प्रवेश अर्जावरील माहिती व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांआधारे शाळांना विद्यार्थी, पालकांकडून माहिती देण्यात येते. असे निदर्शनास आले आहे की, इयत्ता दहावी, अथवा इयत्ता अकरावीत प्रविष्ट विद्यार्थ्यांना व पालकांना वेगवेगळ्या एजन्सीकडून एखाद्या शाळेत, क्लासमध्ये प्रवेश घेण्यासविषयी भ्रमणध्वनीवरून विचारणा करण्यात येते. त्यासंबंधाने वारंवार संपर्क करण्यात येतो. तपशीलात जावून विचारणा केली असता संबंधित पालकाचा भ्रमणध्वनी क्रमांक शाळेकडून पुरविल्याचे निदर्शनास येते. विद्यार्थी व पालकांनी शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती ही केवळ शाळेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हेतुसाठी दिलेली असते. त्यामुळे अशी माहिती इतर कुणालाही उपलब्ध करून देता येत नाही. यापुढे अशा प्रकारे विद्यार्थ्याचे नाव, जात, जन्मदिनांक वैयक्तिक माहिती संबंधित पालकाच्या परवानगीशिवाय परस्पर पुरविण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
शाळांकडून अशा प्रकारची माहिती दिल्याचे निदर्शनास येते. विद्यार्थी, पालकांनी शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती ही केवळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हेतुसाठी दिलेली असते. त्यामुळे शाळांनी परस्पर माहिती पुरवू नये, खबरदारी घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.
काही शाळांकडून असे प्रकार होतात, परंतु शिक्षण विभाग शाळांना दोषी धरत असले तरी हे प्रमाण नगण्य आहे. शिक्षण मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जावर मोबाइल नंबर जेव्हापासून घेत आहे, तेव्हापासून हे प्रकार वाढले आहेत. मंडळाकडूनच विद्यार्थी, पालकांचे नंबर फुटण्याची शक्यता जास्त असल्याचे मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल यांनी म्हटले.