सिंधुताईंची अपूर्ण इच्छा आता तरी पूर्ण होणार का? शिक्षणविभागाकडे होतेय मागणी
सिंधुताईंच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. त्यांचे समाजकार्य, ममता कधीही न विसरण्यासारखी आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली घेतली नाही अशी खंत त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखविली होती. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणविभागाने यावर निर्णय घ्यावा अशी इच्छा व्यक्त होत आहे.
हायलाइट्स:
- कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात सिंधुताईंच्या चरित्राचा समावेश
- महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात समावेश होण्याची खंत
- मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे होतेय मागणी
Sindhutai Sakpal biography: ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, प्रेमाची सावली असलेल्या, सर्व सामान्यांची ताई असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या घटनेनंतर महाराष्ट्रासह सर्व देश शोकसागरात बुडाला. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनतेसह देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा श्रध्दांजली वाहून सिंधुताईंच्या निधनानंतर आपला शोक व्यक्त केला होता. असे असताना सिंधुताईंच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. त्यांचे समाजकार्य, ममता कधीही न विसरण्यासारखी आहे. समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी एक खंत मात्र व्यक्त केली होती. ताईंचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली घेतली नाही. ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती. ती क्लिप आता सर्वत्र वायरल होत आहे.
महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठ होतं अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत या व्हिडिओमध्ये आहे. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख आहे. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये जन्माला आली त्या महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताईंची अखेरची इच्छा मात्र शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. तत्कालिन शालेय शिक्षणमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी उदय नरे यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. पण ठाकरे सरकारच्या काळात या मागणीवर निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी असा एक संदेश समाजात फिरत आहे.
महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठ होतं अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत या व्हिडिओमध्ये आहे. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख आहे. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये जन्माला आली त्या महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताईंची अखेरची इच्छा मात्र शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. तत्कालिन शालेय शिक्षणमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी उदय नरे यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. पण ठाकरे सरकारच्या काळात या मागणीवर निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी असा एक संदेश समाजात फिरत आहे.