म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
विद्याविहार येथील तीन सोमय्या कॉलेजांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात कोणताही अभ्यासक्रम चालविला जाणार नाही. यामुळे येथे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी निराशा होणार आहे. या कॉलेजातील बीएमएम, बॅफ, बीएसस्सी यासारख्या अभ्यासक्रमांच्या सुमारे ४० तुकड्या बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. याचा फटका दीड हजार जागांना बसणार असून हे सर्व अभ्यासक्रम सोमय्या विद्याविहार या खासगी विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. मात्र अभ्यासक्रम बंद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अद्याप परवानगी दिलेली नाही.
बड्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता देऊन त्यांचे रुपांतर खासगी विद्यापीठांमध्ये करण्याचे सरकारचे धोरण होते. यानुसार 'सोमय्या विद्याविहार विद्यापीठ' सुरू करण्यात आले आहे. परिणामी सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत येणारी सर्व कॉलेजे या विद्यापीठाच्या अंतर्गत येणार आहेत. या कॉलेजांमधील स्वयंअर्थसाह्यित अभ्यासक्रम खासगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मात्र हे करण्यापूर्वी सध्या सुरू असलेले हे अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी न घेताच संस्थेने हा निर्णय घेतला असून नऊ विविध विषयांतील बीएस्सी पदवीचे शिक्षण, कॉमर्सच्या सुमारे १८०० जागा, आर्ट्सच्या ११ विषयांतील शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉलेजांमध्ये या सर्व स्वयंअर्थसाह्यित तुकड्या होत्या. या तुकड्या बंद करून त्या खासगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेताना कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असा आरोप मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे हे अभ्यासक्रम बंद करण्यासाठी संस्थेने विद्यापीठाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ती अद्याप घेतलेली नाही. तसेच या अल्पसंख्याक संस्थेत गुजराती समाजातील तसेच आसपासच्या परिसरातील अनेक अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठाचे पाचपट शुल्क परवडणारे नसून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीतीही गांगुर्डे यांनी व्यक्त केली. याबाबत विद्यापीठाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कुलसचिवांना पत्राद्वारे केली आहे.
निकाल लागला; आता अकरावी प्रवेशासाठी चुरस
नवं शिक्षण धोरण रोजगारक्षम कौशल्य विकसित करणारे: कस्तुरीरंगन
सोमय्या संस्थेने अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. हा अर्ज आल्यानंतर स्थानिय चौकशी समिती संबंधित कॉलेजमध्ये जाऊन पाहणी करते आणि एखादा अभ्यासक्रम बंद करण्यासाठी आवश्यक नियमांची पूर्तता होते की नाही हे पाहून आपला अहवाल सादर करते. यानंतर विद्यापीठातील समिती अंतिम निर्णय घेते, असे विद्यापीठाच्या संलग्नता विभागाचे उपलकुलसचिव दीपक वसावे यांनी सांगितले. या कॉलेजने अर्ज केला असून कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही.
दहावीत तब्बल २४२ विद्यार्थी शतकवीर!
कॅट २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तीन कॉलेजांमध्ये सोमय्या विद्याविहार विद्यापीठ कोणताही अभ्यासक्रम राबविणार नाही. सोमय्या विद्याविहार विद्यापीठ या खासगी विद्यापीठाची स्थापना २०१९मध्ये राज्याच्या विधिमंडळात करण्यात आली. या विद्यापीठाअंतर्गत मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, आर्ट्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स असे विविध अभ्यासक्रम स्वयंअर्थसाह्यित तत्त्वावर शिकविले जाणार आहेत. इंजिनीअरिंग, व्यवस्थापन, आर्ट्स, कॉमर्स या शाखांतील स्वयंअर्थसाह्यित अभ्यासक्रम बंद करण्याबाबत आम्ही मुंबई विद्यापीठाअडे अर्ज केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाणार आहे.
- प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई, प्रोव्होस्ट, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ
विद्याविहार येथील तीन सोमय्या कॉलेजांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात कोणताही अभ्यासक्रम चालविला जाणार नाही. यामुळे येथे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी निराशा होणार आहे. या कॉलेजातील बीएमएम, बॅफ, बीएसस्सी यासारख्या अभ्यासक्रमांच्या सुमारे ४० तुकड्या बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. याचा फटका दीड हजार जागांना बसणार असून हे सर्व अभ्यासक्रम सोमय्या विद्याविहार या खासगी विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. मात्र अभ्यासक्रम बंद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अद्याप परवानगी दिलेली नाही.
बड्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता देऊन त्यांचे रुपांतर खासगी विद्यापीठांमध्ये करण्याचे सरकारचे धोरण होते. यानुसार 'सोमय्या विद्याविहार विद्यापीठ' सुरू करण्यात आले आहे. परिणामी सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत येणारी सर्व कॉलेजे या विद्यापीठाच्या अंतर्गत येणार आहेत. या कॉलेजांमधील स्वयंअर्थसाह्यित अभ्यासक्रम खासगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मात्र हे करण्यापूर्वी सध्या सुरू असलेले हे अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी न घेताच संस्थेने हा निर्णय घेतला असून नऊ विविध विषयांतील बीएस्सी पदवीचे शिक्षण, कॉमर्सच्या सुमारे १८०० जागा, आर्ट्सच्या ११ विषयांतील शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉलेजांमध्ये या सर्व स्वयंअर्थसाह्यित तुकड्या होत्या. या तुकड्या बंद करून त्या खासगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेताना कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असा आरोप मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे हे अभ्यासक्रम बंद करण्यासाठी संस्थेने विद्यापीठाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ती अद्याप घेतलेली नाही. तसेच या अल्पसंख्याक संस्थेत गुजराती समाजातील तसेच आसपासच्या परिसरातील अनेक अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठाचे पाचपट शुल्क परवडणारे नसून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीतीही गांगुर्डे यांनी व्यक्त केली. याबाबत विद्यापीठाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कुलसचिवांना पत्राद्वारे केली आहे.
निकाल लागला; आता अकरावी प्रवेशासाठी चुरस
नवं शिक्षण धोरण रोजगारक्षम कौशल्य विकसित करणारे: कस्तुरीरंगन
सोमय्या संस्थेने अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. हा अर्ज आल्यानंतर स्थानिय चौकशी समिती संबंधित कॉलेजमध्ये जाऊन पाहणी करते आणि एखादा अभ्यासक्रम बंद करण्यासाठी आवश्यक नियमांची पूर्तता होते की नाही हे पाहून आपला अहवाल सादर करते. यानंतर विद्यापीठातील समिती अंतिम निर्णय घेते, असे विद्यापीठाच्या संलग्नता विभागाचे उपलकुलसचिव दीपक वसावे यांनी सांगितले. या कॉलेजने अर्ज केला असून कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही.
दहावीत तब्बल २४२ विद्यार्थी शतकवीर!
कॅट २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तीन कॉलेजांमध्ये सोमय्या विद्याविहार विद्यापीठ कोणताही अभ्यासक्रम राबविणार नाही. सोमय्या विद्याविहार विद्यापीठ या खासगी विद्यापीठाची स्थापना २०१९मध्ये राज्याच्या विधिमंडळात करण्यात आली. या विद्यापीठाअंतर्गत मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, आर्ट्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स असे विविध अभ्यासक्रम स्वयंअर्थसाह्यित तत्त्वावर शिकविले जाणार आहेत. इंजिनीअरिंग, व्यवस्थापन, आर्ट्स, कॉमर्स या शाखांतील स्वयंअर्थसाह्यित अभ्यासक्रम बंद करण्याबाबत आम्ही मुंबई विद्यापीठाअडे अर्ज केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाणार आहे.
- प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई, प्रोव्होस्ट, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ