म. टा. प्रतिनिधी, मुंबई जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपाचा फटका दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे दहावीच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका, तर बारावीच्या सुमारे ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत, असा दावा संघटनांनी केला आहे. परिणामी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाला विलंब होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात शिक्षकही सहभागी झाले आहेत. सध्या शिक्षकांकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.
त्यामुळे १४ मार्चपासून उत्तरपत्रिका स्वीकारणे आणि तपासणीचे काम शिक्षकांनी पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना बोर्डाच्या कार्यालयात पडून आहेत. त्यातच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते.
बारावीच्या उत्तरपत्रिका २७ फेब्रुवारीपर्यंत बोर्डाकडे पडून होत्या. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला आधीच विलंब झाला आहे. त्यात आता पुन्हा शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम थांबविले आहे. त्यामुळे निकालाला विलंब होणार असून, त्याचा फटका पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
'सरकारचा जुन्या पेन्शनचा निर्णय होईपर्यंत शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, शिक्षक उत्तरपत्रिका स्वीकारत नाहीत. त्यामुळे बोर्डाकडे उत्तरपत्रिका पडून आहेत. सद्यस्थितीत दहावीच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत,' अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी दिली. तर 'सध्या बारावीच्या सुमारे ८० लाख उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहेत. यातील अनेक उत्तरपत्रिका बोर्डाकडे पडून आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णपणे थांबवले आहे,' असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
शाळा, कॉलेजांबाहेर आज थाळीनाद जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांनी सुरू केलेल्या संपाचा पुढील टप्पा म्हणून आज, सोमवारी सर्व शाळा-महाविद्यालयांबाहेर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थाळीनाद आंदोलन केले जाणार आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा, त्याचबरोबर कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन केले जाणार आहे.
मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू असल्यास ही परीक्षा पार पडल्यानंतर आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी नमूद केले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात शिक्षकही सहभागी झाले आहेत. सध्या शिक्षकांकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.
त्यामुळे १४ मार्चपासून उत्तरपत्रिका स्वीकारणे आणि तपासणीचे काम शिक्षकांनी पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना बोर्डाच्या कार्यालयात पडून आहेत. त्यातच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते.
बारावीच्या उत्तरपत्रिका २७ फेब्रुवारीपर्यंत बोर्डाकडे पडून होत्या. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला आधीच विलंब झाला आहे. त्यात आता पुन्हा शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम थांबविले आहे. त्यामुळे निकालाला विलंब होणार असून, त्याचा फटका पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
'सरकारचा जुन्या पेन्शनचा निर्णय होईपर्यंत शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, शिक्षक उत्तरपत्रिका स्वीकारत नाहीत. त्यामुळे बोर्डाकडे उत्तरपत्रिका पडून आहेत. सद्यस्थितीत दहावीच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत,' अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी दिली. तर 'सध्या बारावीच्या सुमारे ८० लाख उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहेत. यातील अनेक उत्तरपत्रिका बोर्डाकडे पडून आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णपणे थांबवले आहे,' असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
शाळा, कॉलेजांबाहेर आज थाळीनाद जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांनी सुरू केलेल्या संपाचा पुढील टप्पा म्हणून आज, सोमवारी सर्व शाळा-महाविद्यालयांबाहेर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थाळीनाद आंदोलन केले जाणार आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा, त्याचबरोबर कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन केले जाणार आहे.
मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू असल्यास ही परीक्षा पार पडल्यानंतर आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी नमूद केले.