IAS Success Story: यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या परीक्षेला बसतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. यात काही मोजकेच लोक यशस्वी होतात कारण या परीक्षेसाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. अशा परिस्थितीत यूपीएससीची तयारी करताना नैराश्याचा बळी ठरलेल्या तरुणाची कहाणी आज आम्ही घेऊन आलो आहोत. अशा परिस्थितीत असतनाही त्याने हार मानली नाही. नैराश्यावर मात करत आयएएस बनलेल्या शिशिर गुप्ताची कहाणी जाणून घ्या. शिशिरचे वडील सरकारी शाळेत प्राचार्य आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे राहणाऱ्या शिशिर गुप्ताने जयपूरमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तो जेईई मेन उत्तीर्ण झाला आणि त्यानंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. पुढे त्याने आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला.
शिशिरने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिशिरला मोठ्या पॅकेजसह अबुधाबीमध्ये नोकरी मिळाली. पण आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडून आयएएस अधिकारी होण्याची तयारी सुरू केली.
शिशिरने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिशिरला मोठ्या पॅकेजसह अबुधाबीमध्ये नोकरी मिळाली. पण आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडून आयएएस अधिकारी होण्याची तयारी सुरू केली.