Career Growth Tips: आपल्याला चांगल्या सवयी असतील तर कॉलेज किंवा नोकरी धंद्यात आपल्याला यश मिळतेच. याऊलट आपण जर वाईट सवयींच्या आहारी गेलो असू तर त्याचे परिणाम देखील आपल्याला सहन करावे लागतात. यामध्ये अडचण अशी आहे की एखादी सवय चांगली की वाईट हे आपल्याला ओळखता येत नाही. एखादी गोष्ट करुन आपल्याला छान वाटलं की कळत नकळत ती गोष्ट आपल्याकडून सातत्याने होत राहते. आणि याची आपल्याला सवय लागते. याचे बरे-वाईट परिणाम दिसू लागले की आपण काय करतोय याची जाणिव होते. यासाठी जर तुम्ही तुमच्या अभ्यासावर किंवा करिअरवर लक्ष केंद्रित करु इच्छित असाल तर पुढे देण्यात आलेल्या सवयी आजच सोडा, यामुळे तुम्ही भविष्यात आणखी चांगले काम करू शकाल.
तुम्ही नेहमी तुमच्या मोबाईल आणि इंटरनेटला चिकटलेले असता, त्यामुळे तुमचे कामात लक्ष राहत नाही. त्यामुळे मोबाइलचे व्यसन लागल लागण्याआधीच त्याला आपल्यापासून दूर करा.
दररोज सकाळचा नाश्ता केल्यास दिवस छान जातो. जर तुम्हाला नाश्ता करण्याची सवय असेल, तर ती सवय सोडू नका. अन्न न खाल्ल्याने मेंदूला ग्लुकोज मिळत नाही. याचा तुमच्या नोकरी किंवा अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
यशाचा जास्त विचार केल्याने तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला यश ही मिळू शकत नाही.
१) मोबाइलचा वापर
तुम्ही नेहमी तुमच्या मोबाईल आणि इंटरनेटला चिकटलेले असता, त्यामुळे तुमचे कामात लक्ष राहत नाही. त्यामुळे मोबाइलचे व्यसन लागल लागण्याआधीच त्याला आपल्यापासून दूर करा.
२) नाश्ता न करणे
दररोज सकाळचा नाश्ता केल्यास दिवस छान जातो. जर तुम्हाला नाश्ता करण्याची सवय असेल, तर ती सवय सोडू नका. अन्न न खाल्ल्याने मेंदूला ग्लुकोज मिळत नाही. याचा तुमच्या नोकरी किंवा अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. ३) जंक फूड
बहुतेक जंक फूड हे शिळे आणि खूप तळलेले असतात. ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. तुम्ही आळशी देखील बनू शकता. त्यामुळे ताजेतवाने राहण्यासाठी जंक फूड खाण्याची सवय सोडा.४) संगतीचा परिणाम
मित्रांच्या संगतीचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे वाईट संगत लागली असेल तर ती आजच सोडा. करिअर, व्यवसाय याबद्दल चर्चा करणारे मित्र केव्हाही चांगले ठरतात.५) ईर्ष्या वाटणे
एखाद्याबद्दल ईर्ष्या वाटल्याने तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. जेव्हा आपण फक्त इतरांच्या यशाचा आणि आपल्या दुर्देवी नशिबाचा विचार करुन स्वत:ला दोष देतो तेव्हा ते करिअरसाठी घातक असते.६) मल्टी टास्किंग
जेव्हा तुम्ही मल्टीटास्किंग करता तेव्हा तुम्ही एका विशिष्ट गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. त्यामुळे तुमचे कोणत्याही एका कामात लक्ष नसते. याने कार्यक्षमतेवर परिणाम होतो.७)यशापेक्षा जास्त आनंद
छोटी गोष्ट मिळविली की आपण त्याचाच आनंद साजरा करत राहतो. या आनंदाचा उत्सव कधी होऊन जातो हे आपल्याला कळत नाही.यशाचा जास्त विचार केल्याने तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला यश ही मिळू शकत नाही.