भूषण देशमुख
इतिहास गवाह है
जवाहरलाल नेहरू यांनी पद्धतशीररित्या इंदिरा यांना राजकारणात पुढे आणले. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिले. अल्तमशच्या मृत्यूनंतर सरदारांनी रझिया हिला डावलून तिच्या सावत्र भावाला राज्याभिषेक केला. पण दिल्लीतील लोकांच्या मदतीने रझियाने सुलतानपद काबिज केलेच. नेहरू यांच्या निधनानंतर इंदिरा काही काळ मागे पडल्यासारख्या झाल्या. पण शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मंत्रिपद मिळवलेच.
अस्तित्वाची लढाई
सुलतानशाहीत स्वतःला किंगमेकर समजणारे चहलगनी नावाचे चाळीस सरदार होते. त्यांनी रझियाला दुर्बल समजून तिला बाहुली म्हणून वागवायचा प्रयत्न केला. इंदिरा महिला असल्याने त्या दुर्बलच असतील असे काँग्रेस पक्षातील ढुढ्ढाचार्यानी (सिंडिकेट) गृहित धरले. पण ना रझियाने गुंगी गुढीया बनून राहणे मान्य केले ना इंदिरा गांधी यांनी. दोघींनीही लढा दिला. पण या जीवघेण्या संघर्षात रझिया मारली गेली पण तिने दुर्बलता व दुय्यम भूमिका मान्य केली नाही. इंदिरा गांधी मात्र इतिहास बदलत आपल्या सर्व विरोधकांना पुरून उरल्या.
काटेरी मुकुट
पंतप्रधानपदी निवड झाल्यावर इंदिरा गांधी यांची पहिली चाचणी १९६७मध्ये होणाऱ्या लोकसभा व राज्यांच्या निवडणुकांमध्ये होती. १९५२, १९५७ व १९६१ अशा सलग तीन निवडणूका जिंकून सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला आता प्रस्थापित विरोधी असंतोषाचा (anti-incumbancy factor) सामना करावा लागत होता. स्थानिक स्तरावर लोकांना केंद्राचा वरचष्मा डाचू लागला होता. त्यातून अकाली दल, शिवसेना अशा स्थानिक पक्षांचा उदय होऊ लागला. या सर्व अडथळ्यांवर मात करत १९६७च्या निवडणुकीत ५४ टक्के मते मिळवून काँग्रेसने सत्ता राखली असली तरी जागा कमी झाल्या. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता डळमळू लागली. पक्षबदल करणाऱ्या आयाराम-गयाराम यांचे महत्त्व वाढू लागले. काटेरी मुकुटाचे काटे टोचू लागले.
जबाबदारीचे ओझे
मिझो आदिवासींनी उठाव सुरू केला होता, देशात दुष्काळ पडला होता, मागच्या पाच वर्षांत झालेल्या दोन युद्धांमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती, नियोजन कोलमडले होते. भाषिक वाद पेटते होते. ताश्कंद करार भारतीय जनतेस व विरोधी पक्षांना मान्य नव्हता, नव्हे ती भारताची मानहानी आहे, असे वाटत होते. त्याचे पालन करण्याची नैतिक जबाबदारी इंदिरा यांच्या खांद्यावर येऊन पडली.
तत्त्वांची पुनर्बांधणी
जवाहरलाल नेहरू यांचा काळ हा स्वातंत्र्यलढ्यातून आलेल्या आदर्शांचा काळ होता. मात्र चीनशी झालेल्या युद्धानंतर आदर्शवाद उतरणीला लागला होता. वास्तववादाची महती देशाला पटली होती. देशातील समस्या या सर्वच वेळी हृदयपरिवर्तन, नैतिक समजावणी या मार्गाने सुटतील असे नाही, असे वाटू लागले होते. अशा काळात धडाडीने निर्णय घेत मार्ग काढायची गरज होती. त्यासाठी तत्त्वांची पुनर्बांधणी करणे जरुरीचे होते. प्रत्येक समस्येची उत्तरे वेगळी होती. इंदिरा गांधी यांनी जाहीर करून टाकले ‘मी कोणत्याच वादावर (ism) विश्वास ठेवत नाही.’ याचा अर्थ सर्व पर्याय समस्यांची उकल करायला खुले होते. समस्यांवर मात करणे त्यांना जमले का हे आपण पुढच्या लेखात बघू.
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
mata.upsc@gmail.com
‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.
इतिहास गवाह है
जवाहरलाल नेहरू यांनी पद्धतशीररित्या इंदिरा यांना राजकारणात पुढे आणले. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिले. अल्तमशच्या मृत्यूनंतर सरदारांनी रझिया हिला डावलून तिच्या सावत्र भावाला राज्याभिषेक केला. पण दिल्लीतील लोकांच्या मदतीने रझियाने सुलतानपद काबिज केलेच. नेहरू यांच्या निधनानंतर इंदिरा काही काळ मागे पडल्यासारख्या झाल्या. पण शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मंत्रिपद मिळवलेच.
अस्तित्वाची लढाई
सुलतानशाहीत स्वतःला किंगमेकर समजणारे चहलगनी नावाचे चाळीस सरदार होते. त्यांनी रझियाला दुर्बल समजून तिला बाहुली म्हणून वागवायचा प्रयत्न केला. इंदिरा महिला असल्याने त्या दुर्बलच असतील असे काँग्रेस पक्षातील ढुढ्ढाचार्यानी (सिंडिकेट) गृहित धरले. पण ना रझियाने गुंगी गुढीया बनून राहणे मान्य केले ना इंदिरा गांधी यांनी. दोघींनीही लढा दिला. पण या जीवघेण्या संघर्षात रझिया मारली गेली पण तिने दुर्बलता व दुय्यम भूमिका मान्य केली नाही. इंदिरा गांधी मात्र इतिहास बदलत आपल्या सर्व विरोधकांना पुरून उरल्या.
काटेरी मुकुट
पंतप्रधानपदी निवड झाल्यावर इंदिरा गांधी यांची पहिली चाचणी १९६७मध्ये होणाऱ्या लोकसभा व राज्यांच्या निवडणुकांमध्ये होती. १९५२, १९५७ व १९६१ अशा सलग तीन निवडणूका जिंकून सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला आता प्रस्थापित विरोधी असंतोषाचा (anti-incumbancy factor) सामना करावा लागत होता. स्थानिक स्तरावर लोकांना केंद्राचा वरचष्मा डाचू लागला होता. त्यातून अकाली दल, शिवसेना अशा स्थानिक पक्षांचा उदय होऊ लागला. या सर्व अडथळ्यांवर मात करत १९६७च्या निवडणुकीत ५४ टक्के मते मिळवून काँग्रेसने सत्ता राखली असली तरी जागा कमी झाल्या. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता डळमळू लागली. पक्षबदल करणाऱ्या आयाराम-गयाराम यांचे महत्त्व वाढू लागले. काटेरी मुकुटाचे काटे टोचू लागले.
जबाबदारीचे ओझे
मिझो आदिवासींनी उठाव सुरू केला होता, देशात दुष्काळ पडला होता, मागच्या पाच वर्षांत झालेल्या दोन युद्धांमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती, नियोजन कोलमडले होते. भाषिक वाद पेटते होते. ताश्कंद करार भारतीय जनतेस व विरोधी पक्षांना मान्य नव्हता, नव्हे ती भारताची मानहानी आहे, असे वाटत होते. त्याचे पालन करण्याची नैतिक जबाबदारी इंदिरा यांच्या खांद्यावर येऊन पडली.
तत्त्वांची पुनर्बांधणी
जवाहरलाल नेहरू यांचा काळ हा स्वातंत्र्यलढ्यातून आलेल्या आदर्शांचा काळ होता. मात्र चीनशी झालेल्या युद्धानंतर आदर्शवाद उतरणीला लागला होता. वास्तववादाची महती देशाला पटली होती. देशातील समस्या या सर्वच वेळी हृदयपरिवर्तन, नैतिक समजावणी या मार्गाने सुटतील असे नाही, असे वाटू लागले होते. अशा काळात धडाडीने निर्णय घेत मार्ग काढायची गरज होती. त्यासाठी तत्त्वांची पुनर्बांधणी करणे जरुरीचे होते. प्रत्येक समस्येची उत्तरे वेगळी होती. इंदिरा गांधी यांनी जाहीर करून टाकले ‘मी कोणत्याच वादावर (ism) विश्वास ठेवत नाही.’ याचा अर्थ सर्व पर्याय समस्यांची उकल करायला खुले होते. समस्यांवर मात करणे त्यांना जमले का हे आपण पुढच्या लेखात बघू.
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
mata.upsc@gmail.com
‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.