महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
भूषण देशमुख
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
mata.upsc@gmail.com
ऊर्जा व वाहतूक
नुकत्यात जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून कोणते चित्र उभे राहते, हे आपण आजच्या दुसऱ्या भागात बघू.
विजेची स्थापित क्षमता ३२,७०६ मेगावॉट होती. एल. ई. डी दिव्यांच्या वितरणामध्ये देशात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील करातून जी मालवाहतूक होते त्यातील ८०% मालवाहतूक मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन बंदरातून होते.
सामाजिक क्षेत्र
राज्याची एकूण लोकसंख्या ११.२२ कोटी असून ती देशाच्या ९.३% आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशानंतर राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याची सुमारे ६३% लोकसंख्या ही कार्यबल वयोगटातील (१५-५९ वर्षे) आहे. स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.
राज्याचा दरवार्षिक वृध्दीदर १६% आहे. (६% ने कमी झाला आहे)
राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण ९२९ (देशात ९४३) (राज्यात २००१ मध्ये ते ९२२ होते) असून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये ते ८९४ (देशात ९९१) आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२% (देश ७३%) असून एससी ७९% (६६%) व एसटीसाठी ६५% (देशात ५९%) आहे. यातून असे दिसते की नागरीकरण, वृध्दीदरात कपात, साक्षरता या निर्देशकांमध्ये राज्य आघाडीवर असले तरी स्त्री-पुरुष प्रमाणाच्या बाबतीत राज्य देशाच्या मागे आहे.
धर्मनिहाय लोकसंख्येची आकडेवारी बघितली तर ती पुढील प्रमाणे आहे. (कंसात देशाचे आकडे दिले आहेत.) हिंदू ७९% (७९%), मुस्लिम ११% (१४%), ख्रिश्चन १% (२%), शीख ०.२% (१.७%), बौध्द ५% (०.७%) व जैन १% (०.४%)
मानव विकास
राज्यातील ग्रामीण भागामधील लिंग गुणोत्तर प्रमाण (sex ratio) प्रतिहजार पुरुषांमागे ९६० वरून कमी होऊन २०११ मध्ये ९१२ झाले आहे तर याच कालावधीमध्ये शहरी भागामध्ये ते ८७३ वरून वाढ होऊन ९०३ झाले आहे. ख्रिश्चन लोकसंख्येसाठी लिंगगुणोत्तर प्रमाण सर्वाधिक (१०३१) असून शीखांचे सर्वात कमी (८९१) आहे. राज्यातील प्रौढ साक्षरतेच्या दरात वाढ झाली आहे. (७६ वरून ८२%)
‘महाराष्ट्र मानव विकास अहवाल २०१२’ नुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ०.७५२ आहे. बृहन्मुंबईचा सर्वाधिक (०.८२१) आहे तर नंदूरबारचा सर्वात कमी (०.६०४) आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांचे मानव विकास निर्देशांक राज्याच्या मानव विकास निर्देशांकापेक्षा कमी आहेत.
राज्यात काम न करणाऱ्या लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किंचित घसरून आता ५६% झाले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख व्यक्ती कामाच्या शोधात आहेत.
बालविवाहाचे प्रमाण मुलींसाठी अर्ध्याने तर मुलांसाठी एक तृतीयांश प्रमाणात कमी झाले आहे.
उत्पन्न मोजणीत झालेले बदल
केंद्रीय सांखिकी कार्यालयाने पायाभूत वर्ष २००४-०५वरून २०११-१२ असे सुधारित केले असून, राष्ट्रीय लेख्यांच्या (Accounts) संकलनाच्या पध्दतीत सुधारणा तसेच, नवीन व अलिकडील माहितीचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार देशांतर्गत स्थूल मूल्यवृध्दी (Gross Value Added) हे ‘मूळ किमंतीनुसार देशांतर्गत स्थूल मूल्यवृध्दी’ (GVA as per constant prices) या स्वरूपात सादर करण्यात येत आहेत. तर ‘देशांतर्गत स्थूल उत्पन्न’ (GDP) यास यापुढे ‘बाजार किंमतीनुसार देशांतर्गत स्थूल उत्पन्न’ (GDP as per market prices) असे म्हणण्यात येत आहे. त्यामुळेच देशाच्या GVA पेक्षा GDP वाढलेला दिसतो आहे. बाजार किंमतीतील वाढ ही मूल्य वृध्दीपेक्षा जास्त आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा वाटा १७% असून सर्वात कमी दराने या क्षेत्राची वाढ होत आहे. (१.६%) तर उद्योग क्षेत्राचा वाटा ३१% व सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे (५१%) आहे. सर्वाधिक वाढ सेवा क्षेत्राचीच होत आहे. (८.९%)
‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.
‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा
www.mtonline.in/ymm वर
वाचक प्रश्न
स्टाफ सिलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रामध्ये कार्यालय कुठे आहे?- शेफाली कालेकर
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ०२२-२२०१९११८ हा आहे.
भूषण देशमुख
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
mata.upsc@gmail.com
ऊर्जा व वाहतूक
नुकत्यात जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून कोणते चित्र उभे राहते, हे आपण आजच्या दुसऱ्या भागात बघू.
विजेची स्थापित क्षमता ३२,७०६ मेगावॉट होती. एल. ई. डी दिव्यांच्या वितरणामध्ये देशात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील करातून जी मालवाहतूक होते त्यातील ८०% मालवाहतूक मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन बंदरातून होते.
सामाजिक क्षेत्र
राज्याची एकूण लोकसंख्या ११.२२ कोटी असून ती देशाच्या ९.३% आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशानंतर राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याची सुमारे ६३% लोकसंख्या ही कार्यबल वयोगटातील (१५-५९ वर्षे) आहे. स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.
राज्याचा दरवार्षिक वृध्दीदर १६% आहे. (६% ने कमी झाला आहे)
राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण ९२९ (देशात ९४३) (राज्यात २००१ मध्ये ते ९२२ होते) असून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये ते ८९४ (देशात ९९१) आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२% (देश ७३%) असून एससी ७९% (६६%) व एसटीसाठी ६५% (देशात ५९%) आहे. यातून असे दिसते की नागरीकरण, वृध्दीदरात कपात, साक्षरता या निर्देशकांमध्ये राज्य आघाडीवर असले तरी स्त्री-पुरुष प्रमाणाच्या बाबतीत राज्य देशाच्या मागे आहे.
धर्मनिहाय लोकसंख्येची आकडेवारी बघितली तर ती पुढील प्रमाणे आहे. (कंसात देशाचे आकडे दिले आहेत.) हिंदू ७९% (७९%), मुस्लिम ११% (१४%), ख्रिश्चन १% (२%), शीख ०.२% (१.७%), बौध्द ५% (०.७%) व जैन १% (०.४%)
मानव विकास
राज्यातील ग्रामीण भागामधील लिंग गुणोत्तर प्रमाण (sex ratio) प्रतिहजार पुरुषांमागे ९६० वरून कमी होऊन २०११ मध्ये ९१२ झाले आहे तर याच कालावधीमध्ये शहरी भागामध्ये ते ८७३ वरून वाढ होऊन ९०३ झाले आहे. ख्रिश्चन लोकसंख्येसाठी लिंगगुणोत्तर प्रमाण सर्वाधिक (१०३१) असून शीखांचे सर्वात कमी (८९१) आहे. राज्यातील प्रौढ साक्षरतेच्या दरात वाढ झाली आहे. (७६ वरून ८२%)
‘महाराष्ट्र मानव विकास अहवाल २०१२’ नुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ०.७५२ आहे. बृहन्मुंबईचा सर्वाधिक (०.८२१) आहे तर नंदूरबारचा सर्वात कमी (०.६०४) आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांचे मानव विकास निर्देशांक राज्याच्या मानव विकास निर्देशांकापेक्षा कमी आहेत.
राज्यात काम न करणाऱ्या लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किंचित घसरून आता ५६% झाले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख व्यक्ती कामाच्या शोधात आहेत.
बालविवाहाचे प्रमाण मुलींसाठी अर्ध्याने तर मुलांसाठी एक तृतीयांश प्रमाणात कमी झाले आहे.
उत्पन्न मोजणीत झालेले बदल
केंद्रीय सांखिकी कार्यालयाने पायाभूत वर्ष २००४-०५वरून २०११-१२ असे सुधारित केले असून, राष्ट्रीय लेख्यांच्या (Accounts) संकलनाच्या पध्दतीत सुधारणा तसेच, नवीन व अलिकडील माहितीचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार देशांतर्गत स्थूल मूल्यवृध्दी (Gross Value Added) हे ‘मूळ किमंतीनुसार देशांतर्गत स्थूल मूल्यवृध्दी’ (GVA as per constant prices) या स्वरूपात सादर करण्यात येत आहेत. तर ‘देशांतर्गत स्थूल उत्पन्न’ (GDP) यास यापुढे ‘बाजार किंमतीनुसार देशांतर्गत स्थूल उत्पन्न’ (GDP as per market prices) असे म्हणण्यात येत आहे. त्यामुळेच देशाच्या GVA पेक्षा GDP वाढलेला दिसतो आहे. बाजार किंमतीतील वाढ ही मूल्य वृध्दीपेक्षा जास्त आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा वाटा १७% असून सर्वात कमी दराने या क्षेत्राची वाढ होत आहे. (१.६%) तर उद्योग क्षेत्राचा वाटा ३१% व सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे (५१%) आहे. सर्वाधिक वाढ सेवा क्षेत्राचीच होत आहे. (८.९%)
‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.
‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा
www.mtonline.in/ymm वर
वाचक प्रश्न
स्टाफ सिलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रामध्ये कार्यालय कुठे आहे?- शेफाली कालेकर
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ०२२-२२०१९११८ हा आहे.