डॉ. सुशील तुकाराम बारी
या लेखात आपण २०१८ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरविषयी जाणून घेणार आहोत. मुख्य परीक्षेचा विचार करता त्यात दोन पेपर अनिवार्य असतात. एक म्हणजे 'इंग्रजी' आणि दुसरा स्थानिक भाषेचा उदा. मराठी, गुजराथी, तेलगू आदी. विद्यार्थ्यांना इंग्रजी सोडून दुसरा पेपर निवडण्याची मुभा असते. तसेच या दोन्ही पेपरमध्ये २५ टक्के म्हणजेच ३०० पैकी ७५ गुण मिळवणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत. त्यामुळे या दोन्ही पेपरचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे.
'इंग्रजी अनिवार्य' या पेपरचा विचार करता खालील बाबी लक्षात घ्याव्यात :
१) हा पेपर विद्यार्थ्यांच्या भाषेविषयीचे मूलभूत ज्ञान तपासणे यासाठी असतो.
२) भावी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील भाषेबद्दल मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
३) दहावी व बारावीच्या स्तरावरील भाषेतील मूलभूत संकल्पना यात विचारल्या जातात.
४) २५ टक्के म्हणजेच ७५ गुण ही किमान पात्रता आयोगाने निर्धारित केली आहे.
५) बऱ्याचदा विद्यार्थी या पेपरला गांभीर्याने घेत नाही. त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. कारण या पेपरमध्ये ७५ गुण नाही मिळाले तर इतर पेपर तपासले जात नाहीत.
६) या पेपरसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही; परंतु गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून त्यातील मूलभूत संकल्पना समजून घेणे.
७) शालेय जीवनात भाषेत शिकलेले घटक इथे विचारले जातात. त्यामुळे आपल्याला परिचित असलेल्या घटकांवरच प्रश्न विचारण्याची एकंदर वृत्ती आयोगाची आहे. त्यामुळे शालेय जीवनातील या घटकांना उजाळा देऊन आपण या पेपरमध्ये सहज उत्तीर्ण होऊ शकतो.
इंग्रजी अनिवार्य पेपरचे स्वरूप
गुण : ३००
वेळ : ३ तास
पात्रता : ७५ गुण (२५ टक्के)
इंग्रजी अनिवार्यमध्ये विचारले जाणारे घटक :
१. निबंध : १०० गुण
२. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या : ७५ गुण
३. सारांश लेखन : ७५ गुण
४. व्याकरण : ५० गुण
व्याकरणाच्या बाबतीत नेमके काय विचारणार ते आयोगाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे व्याकरणातील कोणत्याही घटकावर प्रश्न विचारण्याचा विशेषाधिकार आयोगाने स्वत:कडे राखून ठेवला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आपण हे जाणून घेऊ शकतो की आयोग पुन्हा पुन्हा कोणत्या घटकांवर प्रश्न विचारत आहे.
I) २०१८ पेपर : निबंध - इंग्रजी अनिवार्य -
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ६०० शब्दांत १०० गुणांसाठी निबंध लिहिण्यासाठी सूचना आयोगाने पहिल्या प्रश्नात केली आहे.
a) Impact of waterisation on the Indian family
b) Literature Mirrors Society
c) Women in Indian Pacifics
d) Rural-Urban divide in India
वरीलपैकी कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
* निबंध हा भाषेचा एक घटक आहे.
* भाषेच्या पेपरमध्ये निबंध लिहिताना 'जीएस'प्रमाणे लिहू नये.
* निबंध लिहिताना ज्याप्रमाणे निबंधाच्या पेपरमध्ये गांभीर्याने आपण लिहितो त्याच गांभीर्याने या पेपरलाही आपण सामोरं गेलं पाहिजे.
II) उतारा वाचून उत्तरे लिहा. (Comprehension)
या प्रश्नात एक उतारा दिलेला असतो. त्या उताऱ्यावर पाच प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे एक प्रश्न १५ गुणांसाठी विचारलेला असतो. तेव्हा उतारा नीट वाचून स्वत:च्या शब्दांत प्रश्नाची उत्तरे लिहावीत. बऱ्याचदा शालेय जीवनातल्या सवयी असतात की, प्रश्नातील शब्द उताऱ्यात पाहून तसेच्या तसे वाक्य खाली उत्तरात लिहावे. असे करता कामा नये.
III) सारांश लेखन (Precise Writing)
या प्रश्नात दिलेल्या उताऱ्याच्या एक तृतीयांश इतके सारांश लेखन करणे अपेक्षित असते. सारांशलेखन करताना उतारा वाचून त्याचा अर्थ समजून तो स्वत:च्या शब्दांत मांडणे आवश्यक असते. उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी सारांश लेखनात लिहू नयेत.
IV) व्याकरण
२०१८ च्या पेपरचा विचार करता खालील घटकांवर प्रश्न विचारलेले आढळून येतात.
* Write the following sentences after makingg necessary corrections.
* Supply the missing words
* Use the correct forms of the verbs in brackets
* Write the antonyms of the following
* Write the following sentencesas directed without changing the meaning
* Use the following idioms/Phrases in sentences
अशा प्रकारे व्याकरणात प्रश्न विचारले जातात. यापेपरविषयीचे विश्लेषण व स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी Drsushils Spotlight या युट्यूब व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरला वेगळा खूप वेळ दिला नाही तरी चालेल; परंतु पूर्णपणे दुर्लक्ष करू नये.
या लेखात आपण २०१८ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरविषयी जाणून घेणार आहोत. मुख्य परीक्षेचा विचार करता त्यात दोन पेपर अनिवार्य असतात. एक म्हणजे 'इंग्रजी' आणि दुसरा स्थानिक भाषेचा उदा. मराठी, गुजराथी, तेलगू आदी. विद्यार्थ्यांना इंग्रजी सोडून दुसरा पेपर निवडण्याची मुभा असते. तसेच या दोन्ही पेपरमध्ये २५ टक्के म्हणजेच ३०० पैकी ७५ गुण मिळवणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत. त्यामुळे या दोन्ही पेपरचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे.
'इंग्रजी अनिवार्य' या पेपरचा विचार करता खालील बाबी लक्षात घ्याव्यात :
१) हा पेपर विद्यार्थ्यांच्या भाषेविषयीचे मूलभूत ज्ञान तपासणे यासाठी असतो.
२) भावी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील भाषेबद्दल मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
३) दहावी व बारावीच्या स्तरावरील भाषेतील मूलभूत संकल्पना यात विचारल्या जातात.
४) २५ टक्के म्हणजेच ७५ गुण ही किमान पात्रता आयोगाने निर्धारित केली आहे.
५) बऱ्याचदा विद्यार्थी या पेपरला गांभीर्याने घेत नाही. त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. कारण या पेपरमध्ये ७५ गुण नाही मिळाले तर इतर पेपर तपासले जात नाहीत.
६) या पेपरसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही; परंतु गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून त्यातील मूलभूत संकल्पना समजून घेणे.
७) शालेय जीवनात भाषेत शिकलेले घटक इथे विचारले जातात. त्यामुळे आपल्याला परिचित असलेल्या घटकांवरच प्रश्न विचारण्याची एकंदर वृत्ती आयोगाची आहे. त्यामुळे शालेय जीवनातील या घटकांना उजाळा देऊन आपण या पेपरमध्ये सहज उत्तीर्ण होऊ शकतो.
इंग्रजी अनिवार्य पेपरचे स्वरूप
गुण : ३००
वेळ : ३ तास
पात्रता : ७५ गुण (२५ टक्के)
इंग्रजी अनिवार्यमध्ये विचारले जाणारे घटक :
१. निबंध : १०० गुण
२. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या : ७५ गुण
३. सारांश लेखन : ७५ गुण
४. व्याकरण : ५० गुण
व्याकरणाच्या बाबतीत नेमके काय विचारणार ते आयोगाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे व्याकरणातील कोणत्याही घटकावर प्रश्न विचारण्याचा विशेषाधिकार आयोगाने स्वत:कडे राखून ठेवला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आपण हे जाणून घेऊ शकतो की आयोग पुन्हा पुन्हा कोणत्या घटकांवर प्रश्न विचारत आहे.
I) २०१८ पेपर : निबंध - इंग्रजी अनिवार्य -
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ६०० शब्दांत १०० गुणांसाठी निबंध लिहिण्यासाठी सूचना आयोगाने पहिल्या प्रश्नात केली आहे.
a) Impact of waterisation on the Indian family
b) Literature Mirrors Society
c) Women in Indian Pacifics
d) Rural-Urban divide in India
वरीलपैकी कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
* निबंध हा भाषेचा एक घटक आहे.
* भाषेच्या पेपरमध्ये निबंध लिहिताना 'जीएस'प्रमाणे लिहू नये.
* निबंध लिहिताना ज्याप्रमाणे निबंधाच्या पेपरमध्ये गांभीर्याने आपण लिहितो त्याच गांभीर्याने या पेपरलाही आपण सामोरं गेलं पाहिजे.
II) उतारा वाचून उत्तरे लिहा. (Comprehension)
या प्रश्नात एक उतारा दिलेला असतो. त्या उताऱ्यावर पाच प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे एक प्रश्न १५ गुणांसाठी विचारलेला असतो. तेव्हा उतारा नीट वाचून स्वत:च्या शब्दांत प्रश्नाची उत्तरे लिहावीत. बऱ्याचदा शालेय जीवनातल्या सवयी असतात की, प्रश्नातील शब्द उताऱ्यात पाहून तसेच्या तसे वाक्य खाली उत्तरात लिहावे. असे करता कामा नये.
III) सारांश लेखन (Precise Writing)
या प्रश्नात दिलेल्या उताऱ्याच्या एक तृतीयांश इतके सारांश लेखन करणे अपेक्षित असते. सारांशलेखन करताना उतारा वाचून त्याचा अर्थ समजून तो स्वत:च्या शब्दांत मांडणे आवश्यक असते. उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी सारांश लेखनात लिहू नयेत.
IV) व्याकरण
२०१८ च्या पेपरचा विचार करता खालील घटकांवर प्रश्न विचारलेले आढळून येतात.
* Write the following sentences after makingg necessary corrections.
* Supply the missing words
* Use the correct forms of the verbs in brackets
* Write the antonyms of the following
* Write the following sentencesas directed without changing the meaning
* Use the following idioms/Phrases in sentences
अशा प्रकारे व्याकरणात प्रश्न विचारले जातात. यापेपरविषयीचे विश्लेषण व स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी Drsushils Spotlight या युट्यूब व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरला वेगळा खूप वेळ दिला नाही तरी चालेल; परंतु पूर्णपणे दुर्लक्ष करू नये.