- भूषण देशमुख
मुलाखतीची तयारी करताना उमेदवाराला स्वतःशी संबंधित प्रश्नांच्या उत्तराचीही तयारी करून ठेवावी लागते. या प्रश्नांद्वारे मुलाखतकाराला उमेदवाराचे व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे असते. हे प्रश्न काळजीपूर्वक हाताळावे लागतात.
अभिमानाचा क्षण
आयोगाच्या मुलाखतीत एका उमेदवाराला व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आला. तो असा होता की, ‘आजपर्यंतच्या आयुष्यात तू आईवडिलांना अभिमान वाटेल असे कोणते काम केले आहेस?’ असे प्रश्न म्हणजे फुलटॉस बॉल असतात. त्यांच्यावर षट्कारच मारायचा असतो. उमेदवार काय म्हणाला असेल? तो म्हणाला की, ‘एकदा मी माझ्या आईला ऑम्लेट बनवून खायला घातलं होतं’. एक क्षण पॅनल हतबुद्ध झाले. दुसऱ्याच क्षणी एक सदस्य टाळ्या वाजवू लागला. चेअरमन म्हणाले की, सगळ्यांनीच वाजवा. आपण दाद दिलीच पाहिजे. मग काय सगळ्या पॅनेलने मिळून टाळ्या वाजवल्या. संधीची माती कशी करावी याचे हे चांगले उदाहरण म्हणता येईल.
नथिंग पर्सनल अबाऊट इट
१) तुमच्या आयुष्याचे ध्येय कोणते? तुमच्या अस्तित्वाचे रहस्य काय? (कोहम ते सोहम)
२) नागरी सेवांचीच निवड का केली? (स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय माझा स्वतःचा आहे हे आधी स्वतःला व नंतर पॅनेलला पटवून देता आले पाहिजे)
३) कोणत्याही कारणाने अपयश आले तर पर्यायी करियर प्लॅन काय आहे?
४) तुमचे कोणते गुण तुम्हाला भावतात?
५) आयुष्यात केलेल्या तीन मोठ्या चुका कोणत्या?
६) आयुष्यात कोणत्या तीन गोष्टींनी योग्य वेळी हात दिला?
७) तुमचे प्रशासनातील आदर्श कोणते? (दोन-तीन आदर्श व त्यांचे योगदान यावर माहिती जमवून ठेवायला हवी)
८) तुमचे राजकारणातील आदर्श कोणते? (असले पाहिजेत, सांगितले पाहिजेत व त्यांच्या गुणदोषांवर खुल्या मनाने चर्चादेखील करता आली पाहिजे)
९) तुम्ही तुमचा राजकीय कल कसा स्पष्ट कराल? डावा, उजवा, मध्यम की मध्यम-डावा किंवा मध्यम-उजवा.
१०) प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचे अग्रक्रम कोणते असतील?
११) पंधरा वर्षांनी तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असाल?
१२) (जर मुलाखतीपर्यंत पोहोचायला अनेक प्रयत्न करावे लागले असतील) तर ते का करावे लागले?
१३) कोणते विषय तुमचे नावडते आहेत?
१४) आम्ही तुमची निवड का करावी?
१५) तुम्ही तुमच्या पत्नीला घरकामाचा पगार द्याल का?
१६) तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणी हुंडा देत किंवा घेत असल्याचे कळल्यास तुम्ही त्या विवाहास हजेरी लावेल का? (उत्तरात याहून जास्त काही करण्याची अपेक्षा आहे)
वजूद की तलाश
वरील प्रश्नांना प्रमाणित (standard) उत्तरे नाहीत. ती व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. महत्त्वाचे हे आहे की उमेदवार एक व्यक्ती म्हणून स्वतःबद्दल सजग आहे की नाही? या प्रश्नांमधून उमेदवाराची संवेदनशीलता, व्यक्तिगत कल दिसून येतात. थोडक्यात हे प्रश्न चौकार, षटकार मारून मोठा पल्ला गाठण्याचे असतात. त्यांच्यावर भरभरून बोलता आले पाहिजे. त्यासाठी मुळात स्वतःचा शोध घ्यायला हवा. पिंक चित्रपटात म्हटल्याप्रमाणे…
तू खुद की खोज मैं निकल,
तू किस लिये हताश है
तू चल, तेरे वजुद की
समय को भी तलाश है
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
जर माझा राज्यसेवेचा स्कोर चांगला येत असेल तर मी यू.पी.एस.सी.ची पूर्वपरीक्षाही सहज पास होऊ शकतो का?
- प्रसाद पाटील
उत्तर : असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत पेपर एकमध्ये चांगले गुण येत आहेत की दोनमध्ये हे आधी बघावे लागेल. जर पेपर दोनमुळे स्कोर वर गेला असेल तर त्याचा यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षेसाठी काही फायदा नाही.
‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.
‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा
www.mtonline.in/ymm वर
मुलाखतीची तयारी करताना उमेदवाराला स्वतःशी संबंधित प्रश्नांच्या उत्तराचीही तयारी करून ठेवावी लागते. या प्रश्नांद्वारे मुलाखतकाराला उमेदवाराचे व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे असते. हे प्रश्न काळजीपूर्वक हाताळावे लागतात.
अभिमानाचा क्षण
आयोगाच्या मुलाखतीत एका उमेदवाराला व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आला. तो असा होता की, ‘आजपर्यंतच्या आयुष्यात तू आईवडिलांना अभिमान वाटेल असे कोणते काम केले आहेस?’ असे प्रश्न म्हणजे फुलटॉस बॉल असतात. त्यांच्यावर षट्कारच मारायचा असतो. उमेदवार काय म्हणाला असेल? तो म्हणाला की, ‘एकदा मी माझ्या आईला ऑम्लेट बनवून खायला घातलं होतं’. एक क्षण पॅनल हतबुद्ध झाले. दुसऱ्याच क्षणी एक सदस्य टाळ्या वाजवू लागला. चेअरमन म्हणाले की, सगळ्यांनीच वाजवा. आपण दाद दिलीच पाहिजे. मग काय सगळ्या पॅनेलने मिळून टाळ्या वाजवल्या. संधीची माती कशी करावी याचे हे चांगले उदाहरण म्हणता येईल.
नथिंग पर्सनल अबाऊट इट
१) तुमच्या आयुष्याचे ध्येय कोणते? तुमच्या अस्तित्वाचे रहस्य काय? (कोहम ते सोहम)
२) नागरी सेवांचीच निवड का केली? (स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय माझा स्वतःचा आहे हे आधी स्वतःला व नंतर पॅनेलला पटवून देता आले पाहिजे)
३) कोणत्याही कारणाने अपयश आले तर पर्यायी करियर प्लॅन काय आहे?
४) तुमचे कोणते गुण तुम्हाला भावतात?
५) आयुष्यात केलेल्या तीन मोठ्या चुका कोणत्या?
६) आयुष्यात कोणत्या तीन गोष्टींनी योग्य वेळी हात दिला?
७) तुमचे प्रशासनातील आदर्श कोणते? (दोन-तीन आदर्श व त्यांचे योगदान यावर माहिती जमवून ठेवायला हवी)
८) तुमचे राजकारणातील आदर्श कोणते? (असले पाहिजेत, सांगितले पाहिजेत व त्यांच्या गुणदोषांवर खुल्या मनाने चर्चादेखील करता आली पाहिजे)
९) तुम्ही तुमचा राजकीय कल कसा स्पष्ट कराल? डावा, उजवा, मध्यम की मध्यम-डावा किंवा मध्यम-उजवा.
१०) प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचे अग्रक्रम कोणते असतील?
११) पंधरा वर्षांनी तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असाल?
१२) (जर मुलाखतीपर्यंत पोहोचायला अनेक प्रयत्न करावे लागले असतील) तर ते का करावे लागले?
१३) कोणते विषय तुमचे नावडते आहेत?
१४) आम्ही तुमची निवड का करावी?
१५) तुम्ही तुमच्या पत्नीला घरकामाचा पगार द्याल का?
१६) तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणी हुंडा देत किंवा घेत असल्याचे कळल्यास तुम्ही त्या विवाहास हजेरी लावेल का? (उत्तरात याहून जास्त काही करण्याची अपेक्षा आहे)
वजूद की तलाश
वरील प्रश्नांना प्रमाणित (standard) उत्तरे नाहीत. ती व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. महत्त्वाचे हे आहे की उमेदवार एक व्यक्ती म्हणून स्वतःबद्दल सजग आहे की नाही? या प्रश्नांमधून उमेदवाराची संवेदनशीलता, व्यक्तिगत कल दिसून येतात. थोडक्यात हे प्रश्न चौकार, षटकार मारून मोठा पल्ला गाठण्याचे असतात. त्यांच्यावर भरभरून बोलता आले पाहिजे. त्यासाठी मुळात स्वतःचा शोध घ्यायला हवा. पिंक चित्रपटात म्हटल्याप्रमाणे…
तू खुद की खोज मैं निकल,
तू किस लिये हताश है
तू चल, तेरे वजुद की
समय को भी तलाश है
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
जर माझा राज्यसेवेचा स्कोर चांगला येत असेल तर मी यू.पी.एस.सी.ची पूर्वपरीक्षाही सहज पास होऊ शकतो का?
- प्रसाद पाटील
उत्तर : असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत पेपर एकमध्ये चांगले गुण येत आहेत की दोनमध्ये हे आधी बघावे लागेल. जर पेपर दोनमुळे स्कोर वर गेला असेल तर त्याचा यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षेसाठी काही फायदा नाही.
‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.
‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा
www.mtonline.in/ymm वर