पूर्वतयारी
थेट अभिरूप मुलाखती न देता आधी काही पूर्वतयारी करणे चांगले. त्यात मागे बघितल्याप्रमाणे आपल्या बायोडाटाशी संबंधित माहिती गोळा करणे, त्याशिवाय मुलाखत डोळ्यासमोर आणून तिचे कल्पनाचित्र मनात तयार करणे या गोष्टी येतात. तसे केल्याने मन व शरीर मुलाखतीसाठी तयार होते. पुढच्या टप्प्यात येते नेहमी येऊ शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहून काढणे. (उदा. तुम्हाला प्रशासकीय सेवांमध्ये का यायचे आहे?) ही उत्तरे चांगल्याप्रकारे घोटवून ठेवावीत. इथपर्यंत तयारी झाली की, मग मित्रांमध्ये मुलाखत द्यायला सुरुवात करावी. मित्रच असल्याने तितकासा तणाव येत नाही. मित्रांकडून सूचना घ्याव्यात. याच टप्प्यात जर काही ढोबळ दोष असतील तर ते दूर करता येतील.
नेट प्रॅक्टिस
आता पुढचा टप्पा म्हणजे अनुभवी अशा पॅनेलसमोर अभिरूप मुलाखत देणे. ही एक प्रकारची नेट प्रॅक्टिस असते. आऊट झाले तर चालते पण आऊट होणार नाही या निर्धाराने खेळायचे असते. मॉक दिल्यामुळे भीती मरते. अशा किती मुलाखती व कुठे देणार याचेही नियोजन करायला हवे. यू. पी. एस. सी.ची एखादी मुलाखत दिल्लीत द्यायलाही हरकत नाही. त्यातून स्थानिक वातावरणाचा अंदाज येतो. जे कपडे घालून आपण मुलाखत देणार त्याच प्रकारचे किंवा शक्य झाले तर तेच कपडे घालून अभिरूप मुलाखत दिल्यास अजूनच सहजता आणता येते.
मुलाखतीचे रंग
मुलाखत घेणारे स्पर्धा परीक्षांशी संबंधित आहेत ना याची खात्री करून घ्यायला हवी. साधारणपणे पाच ते सहा अभिरूप मुलाखती द्यायला हरकत नाही. मात्र खूप जास्त प्रवास करून एखादी अभिरूप मुलाखत देण्याचा आटापिटा करण्याची गरज नाही. अट एकच, ती म्हणजे प्रत्येक मुलाखत गंभीरपणे घ्यायला हवी. अर्धवट मनाने मुलाखत दिल्यास वेळ तर जातोच (आपलाही व पॅनल सदस्यांचाही) पण आत्मविश्वासही जाऊ शकतो. त्यामुळे जर तयारी झाली असेल (पूर्वतयारी या उताऱ्यातील टप्पे) तरच अभिरूप मुलाखती देणे चांगले. उगाचच कोणीतरी आग्रह करते आहे, किंवा तेथली मुलाखत प्रसिद्ध आहे किंवा लकी ठरते असा प्रकार नको.
लक्ष्यनिश्चिती
अभिरूप मुलाखतीतून आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे यावर स्पष्टता हवी. (उदा. तुमची संवाद कौशल्ये तुम्हाला घासूनपुसून घ्यायची आहेत.) अशाप्रकारे लक्ष्य निश्चित केले तर अशा मुलाखती जास्त फलदायी ठरतात. सुरुवातीच्या एक-दोन मुलाखतीत आवाजाची पट्टी, हातवारे, नेत्रपल्लवी, बसण्याची पद्धत अशा शारीरिक हालचालींवर लक्ष्य केंद्रीत केलेले चांगले. एकदा शरीरावर ताबा मिळाला की, मग पुढच्या टप्प्यात विचारप्रक्रिया, वाद व संवाद यातील कौशल्य याकडे लक्ष वळवता येईल. शेवटच्या अभिरूप मुलाखतीत रंगीत तालीम केल्याप्रमाणे शरीर व मनावरचे संपूर्ण नियंत्रण दाखवून देत व त्यांची सांगड घालत प्रभावी मुलाखत देता आली पाहिजे.
व्यक्तिनिष्ठ विरुद्ध वस्तुनिष्ठ
मुलाखत हा प्रकार मोठया प्रमाणावर व्यक्तिनिष्ठतेवर (subjective) आधारलेला आहे. एका मर्यादेनंतर मुलाखतीच्या अनुभवाचे सामान्यीकरण करता येत नाही. मुलाखतीत वस्तुनिष्ठता (objectivity) नसतेच असे नाही, पण तिचे प्रमाण कमी असते. ही गोष्ट लक्षात घेतली तर कळेल की, मुलाखतीचा अनुभव हा पॅनलनुसार बदलू शकतो. एका मुलाखतीत पॅनल उमेदवाराला 'सर्वात योग्य व्यक्ती' घोषित करेल तर पुढच्याच अभिरूप मुलाखतीत पॅनल 'मुलाखतीपर्यंत कसे काय पोहोचलात?' अशी विचारणा करून पाणउतारा करू शकेल.
- भूषण देशमुख
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
mata.upsc@gmail.com
वाचक प्रश्न
माझ्या आईवडिलांचे उत्पन्न ओबीसी मर्यादेच्या पुढे आहे व ते क्लास दोनचे कर्मचारी आहेत. मला आरक्षणाचा फायदा मिळू शकतो का?
- वैभव वनावे
जर आईवडिलांची नियुक्ती क्लास तीन व चारमध्ये झाली असेल व पहिल्या वीस वर्षांत त्यांना क्लास एक किंवा दोन पदावर बढती मिळाली नसेल तर त्यांची मुले आरक्षणाला पात्र मानली जातात.
थेट अभिरूप मुलाखती न देता आधी काही पूर्वतयारी करणे चांगले. त्यात मागे बघितल्याप्रमाणे आपल्या बायोडाटाशी संबंधित माहिती गोळा करणे, त्याशिवाय मुलाखत डोळ्यासमोर आणून तिचे कल्पनाचित्र मनात तयार करणे या गोष्टी येतात. तसे केल्याने मन व शरीर मुलाखतीसाठी तयार होते. पुढच्या टप्प्यात येते नेहमी येऊ शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहून काढणे. (उदा. तुम्हाला प्रशासकीय सेवांमध्ये का यायचे आहे?) ही उत्तरे चांगल्याप्रकारे घोटवून ठेवावीत. इथपर्यंत तयारी झाली की, मग मित्रांमध्ये मुलाखत द्यायला सुरुवात करावी. मित्रच असल्याने तितकासा तणाव येत नाही. मित्रांकडून सूचना घ्याव्यात. याच टप्प्यात जर काही ढोबळ दोष असतील तर ते दूर करता येतील.
नेट प्रॅक्टिस
आता पुढचा टप्पा म्हणजे अनुभवी अशा पॅनेलसमोर अभिरूप मुलाखत देणे. ही एक प्रकारची नेट प्रॅक्टिस असते. आऊट झाले तर चालते पण आऊट होणार नाही या निर्धाराने खेळायचे असते. मॉक दिल्यामुळे भीती मरते. अशा किती मुलाखती व कुठे देणार याचेही नियोजन करायला हवे. यू. पी. एस. सी.ची एखादी मुलाखत दिल्लीत द्यायलाही हरकत नाही. त्यातून स्थानिक वातावरणाचा अंदाज येतो. जे कपडे घालून आपण मुलाखत देणार त्याच प्रकारचे किंवा शक्य झाले तर तेच कपडे घालून अभिरूप मुलाखत दिल्यास अजूनच सहजता आणता येते.
मुलाखतीचे रंग
मुलाखत घेणारे स्पर्धा परीक्षांशी संबंधित आहेत ना याची खात्री करून घ्यायला हवी. साधारणपणे पाच ते सहा अभिरूप मुलाखती द्यायला हरकत नाही. मात्र खूप जास्त प्रवास करून एखादी अभिरूप मुलाखत देण्याचा आटापिटा करण्याची गरज नाही. अट एकच, ती म्हणजे प्रत्येक मुलाखत गंभीरपणे घ्यायला हवी. अर्धवट मनाने मुलाखत दिल्यास वेळ तर जातोच (आपलाही व पॅनल सदस्यांचाही) पण आत्मविश्वासही जाऊ शकतो. त्यामुळे जर तयारी झाली असेल (पूर्वतयारी या उताऱ्यातील टप्पे) तरच अभिरूप मुलाखती देणे चांगले. उगाचच कोणीतरी आग्रह करते आहे, किंवा तेथली मुलाखत प्रसिद्ध आहे किंवा लकी ठरते असा प्रकार नको.
लक्ष्यनिश्चिती
अभिरूप मुलाखतीतून आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे यावर स्पष्टता हवी. (उदा. तुमची संवाद कौशल्ये तुम्हाला घासूनपुसून घ्यायची आहेत.) अशाप्रकारे लक्ष्य निश्चित केले तर अशा मुलाखती जास्त फलदायी ठरतात. सुरुवातीच्या एक-दोन मुलाखतीत आवाजाची पट्टी, हातवारे, नेत्रपल्लवी, बसण्याची पद्धत अशा शारीरिक हालचालींवर लक्ष्य केंद्रीत केलेले चांगले. एकदा शरीरावर ताबा मिळाला की, मग पुढच्या टप्प्यात विचारप्रक्रिया, वाद व संवाद यातील कौशल्य याकडे लक्ष वळवता येईल. शेवटच्या अभिरूप मुलाखतीत रंगीत तालीम केल्याप्रमाणे शरीर व मनावरचे संपूर्ण नियंत्रण दाखवून देत व त्यांची सांगड घालत प्रभावी मुलाखत देता आली पाहिजे.
व्यक्तिनिष्ठ विरुद्ध वस्तुनिष्ठ
मुलाखत हा प्रकार मोठया प्रमाणावर व्यक्तिनिष्ठतेवर (subjective) आधारलेला आहे. एका मर्यादेनंतर मुलाखतीच्या अनुभवाचे सामान्यीकरण करता येत नाही. मुलाखतीत वस्तुनिष्ठता (objectivity) नसतेच असे नाही, पण तिचे प्रमाण कमी असते. ही गोष्ट लक्षात घेतली तर कळेल की, मुलाखतीचा अनुभव हा पॅनलनुसार बदलू शकतो. एका मुलाखतीत पॅनल उमेदवाराला 'सर्वात योग्य व्यक्ती' घोषित करेल तर पुढच्याच अभिरूप मुलाखतीत पॅनल 'मुलाखतीपर्यंत कसे काय पोहोचलात?' अशी विचारणा करून पाणउतारा करू शकेल.
- भूषण देशमुख
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
mata.upsc@gmail.com
वाचक प्रश्न
माझ्या आईवडिलांचे उत्पन्न ओबीसी मर्यादेच्या पुढे आहे व ते क्लास दोनचे कर्मचारी आहेत. मला आरक्षणाचा फायदा मिळू शकतो का?
- वैभव वनावे
जर आईवडिलांची नियुक्ती क्लास तीन व चारमध्ये झाली असेल व पहिल्या वीस वर्षांत त्यांना क्लास एक किंवा दोन पदावर बढती मिळाली नसेल तर त्यांची मुले आरक्षणाला पात्र मानली जातात.