देशाच्या आर्थिक पाहणीतील नोंदी आज आपण पाहू. या नोंदींचा वापर पूर्व व मुख्य परीक्षेत तर होईलच, पण सध्या चालू असलेल्या दोन्ही (केंद्रीय व राज्य) आयोगाच्या मुलाखतीसाठीही होऊ शकेल.
-लागोपाठ तिसऱ्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था सात टक्क्यांहून जास्त वाढ नोंदवेल.
-घाऊक बाजार निर्देशांक (WPI) नकारात्मक आहे, तर ग्राहक बाजार निर्देशांक (CPI) मागील काही वर्षांपेक्षा अर्ध्यापर्यंत खाली उतरला आहे.
-प्रगत अर्थव्यवस्थांच्या संथ वाढीमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसला आहे. पण त्याचवेळी आयातही घसरली आहे. प्रामुख्याने तेलाच्या किमती घसरल्याने हे शक्य झाले. परिणामी भारताची व्यापारी व चालू खात्यावरील तूट मामुली आहे.
-भारत हा सामान्यत: आयातदार आहे. कारण १९६०-६१पासून फक्त सातच वर्षे अशी होती, की जेव्हा निर्यातीने आयातीवर मात केली. १९९३-९४पासून असा योग परत आलेला नाही.
-लागोपाठ दोन वर्षे अवर्षण असल्याने (१३% कमी पाऊस) शेतीची वाढ मंदावली आहे. लागोपाठ दोनदा मान्सूनने कमी पाऊस दिला. गेल्या ११५ वर्षांत असे फक्त चार वेळा झाले आहे.
-बचत व गुंतवणूक यात काही उठावदार कामगिरी दिसेल, अशी शक्यता नाही.
-भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. पण जगातील इतर चलनांच्या तुलनेत सुधारला आहे.
-जगाच्या वाढीचे इंजिन असे जिला म्हटले जाते, ती चीनची अर्थव्यवस्था सध्या संतुलन साधण्यात गर्क आहे. त्यामुळे भारताला मोठी भूमिका मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-भारताचे सध्याचे वाढीचे पुनरोत्थान हे उपभोग खर्चाने प्रेरीत आहे.
-उद्योग क्षेत्राने जोमदार वाढ दर्शवली आहे. विशेषत: उत्पादन क्रियेमध्ये ती दिसते.
-राजकोषीय तूट यावर्षी आपले लक्ष्य गाठेल (३.९ %) असे दिसते. त्यामुळे पुढचे वेळापत्रक म्हणजे २०१६-१७ व मध्ये ३.५ % व २०१७-१८ मध्ये ३% हेही साध्य होईल अशी आशा आहे.
-किंमत वाढीला आळा घालण्यासाठी सरकारने एक 'किंमत स्थिरीकरण निधी' तयार केला आहे.
-सध्या भारताकडे साधारणपणे ३५० बिलियन डॉलर इतकी परकीय चलन गंगाजळी तयार झाली आहे. ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
-भारताची बाह्य कर्जे सुरक्षित मर्यादेत आहेत. सध्या बाह्य कर्जाचे जीडीपीशी प्रमाण २३ % आहे.
-सेवा क्षेत्राने भारताच्या अर्थव्यवस्थेत कळीची भूमिका निभावली आहे. सेवा क्षेत्र विस्तारत असले तरी जागतिक वित्तीय संकटाचा फटाका सेवा क्षेत्रालाही बसला आहे.
-दिल्लीच्या अर्थव्यवस्थेच्या ८७% प्रमाण सेवा क्षेत्राचे आहे तर ६३% सेवेचा वाटा घेऊन हाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-जागतिक सेवांमध्ये भारताच्या सेवा निर्यातीचा वाटा (३.२ %) हा भारताच्या जागतिक वस्तू निर्यातीच्या वाट्याच्या (१.७%) दुप्पट आहे.
-आरबीआयने २०१५ या वर्षामध्ये २३ नवीन बँकांना परवाने दिले. त्यातील २ आंतरराष्ट्रीय बँका आहेत, ११ पेमेंट बँका आहेत तर १० लघु वित्त बँका आहेत.
-दररोज ३ लाख खाती उघडत प्रधानमंत्री जन धन योजनेने नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या एका वर्षातच एक कोटी वीस लाख खाती उघडण्यात आली. या योजनेचे नाव गिनीज बुकातही समाविष्ट झाले आहे.
-थेट खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करणारा 'पहेल' हा जगातील सर्वात मोठा अशा प्रकारचा कार्यक्रम ठरला आहे. पहेल मार्गे एलपीजी अनुदानाचे सुमारे २९००० कोटी थेट लोकांच्या खात्यात जमा केले गेले.
-राजकोषीय समायोजन (fiscal consolidation) करत राहण्यावर भर दिला पाहिजे. यात महसूल वाढवणे व खर्चाचे तार्कीकीकरण करणे यांचा समावेश होतो. ...............
वाचक प्रश्न
लोकसेवा आयोग पदांच्या किती प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी बोलवतात?
- सिद्धी भोसले
लोकसेवा आयोगाच्या धोरणाप्रमाणे पदांच्या कमाल तीन पट उमेदवार मुलाखतीसाठी बोलविता येतात. (म्हणजेच १:३ प्रमाणात)
................
- भूषण देशमुख
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
mata.upsc@gmail.com
-लागोपाठ तिसऱ्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था सात टक्क्यांहून जास्त वाढ नोंदवेल.
-घाऊक बाजार निर्देशांक (WPI) नकारात्मक आहे, तर ग्राहक बाजार निर्देशांक (CPI) मागील काही वर्षांपेक्षा अर्ध्यापर्यंत खाली उतरला आहे.
-प्रगत अर्थव्यवस्थांच्या संथ वाढीमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसला आहे. पण त्याचवेळी आयातही घसरली आहे. प्रामुख्याने तेलाच्या किमती घसरल्याने हे शक्य झाले. परिणामी भारताची व्यापारी व चालू खात्यावरील तूट मामुली आहे.
-भारत हा सामान्यत: आयातदार आहे. कारण १९६०-६१पासून फक्त सातच वर्षे अशी होती, की जेव्हा निर्यातीने आयातीवर मात केली. १९९३-९४पासून असा योग परत आलेला नाही.
-लागोपाठ दोन वर्षे अवर्षण असल्याने (१३% कमी पाऊस) शेतीची वाढ मंदावली आहे. लागोपाठ दोनदा मान्सूनने कमी पाऊस दिला. गेल्या ११५ वर्षांत असे फक्त चार वेळा झाले आहे.
-बचत व गुंतवणूक यात काही उठावदार कामगिरी दिसेल, अशी शक्यता नाही.
-भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. पण जगातील इतर चलनांच्या तुलनेत सुधारला आहे.
-जगाच्या वाढीचे इंजिन असे जिला म्हटले जाते, ती चीनची अर्थव्यवस्था सध्या संतुलन साधण्यात गर्क आहे. त्यामुळे भारताला मोठी भूमिका मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-भारताचे सध्याचे वाढीचे पुनरोत्थान हे उपभोग खर्चाने प्रेरीत आहे.
-उद्योग क्षेत्राने जोमदार वाढ दर्शवली आहे. विशेषत: उत्पादन क्रियेमध्ये ती दिसते.
-राजकोषीय तूट यावर्षी आपले लक्ष्य गाठेल (३.९ %) असे दिसते. त्यामुळे पुढचे वेळापत्रक म्हणजे २०१६-१७ व मध्ये ३.५ % व २०१७-१८ मध्ये ३% हेही साध्य होईल अशी आशा आहे.
-किंमत वाढीला आळा घालण्यासाठी सरकारने एक 'किंमत स्थिरीकरण निधी' तयार केला आहे.
-सध्या भारताकडे साधारणपणे ३५० बिलियन डॉलर इतकी परकीय चलन गंगाजळी तयार झाली आहे. ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
-भारताची बाह्य कर्जे सुरक्षित मर्यादेत आहेत. सध्या बाह्य कर्जाचे जीडीपीशी प्रमाण २३ % आहे.
-सेवा क्षेत्राने भारताच्या अर्थव्यवस्थेत कळीची भूमिका निभावली आहे. सेवा क्षेत्र विस्तारत असले तरी जागतिक वित्तीय संकटाचा फटाका सेवा क्षेत्रालाही बसला आहे.
-दिल्लीच्या अर्थव्यवस्थेच्या ८७% प्रमाण सेवा क्षेत्राचे आहे तर ६३% सेवेचा वाटा घेऊन हाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-जागतिक सेवांमध्ये भारताच्या सेवा निर्यातीचा वाटा (३.२ %) हा भारताच्या जागतिक वस्तू निर्यातीच्या वाट्याच्या (१.७%) दुप्पट आहे.
-आरबीआयने २०१५ या वर्षामध्ये २३ नवीन बँकांना परवाने दिले. त्यातील २ आंतरराष्ट्रीय बँका आहेत, ११ पेमेंट बँका आहेत तर १० लघु वित्त बँका आहेत.
-दररोज ३ लाख खाती उघडत प्रधानमंत्री जन धन योजनेने नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या एका वर्षातच एक कोटी वीस लाख खाती उघडण्यात आली. या योजनेचे नाव गिनीज बुकातही समाविष्ट झाले आहे.
-थेट खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करणारा 'पहेल' हा जगातील सर्वात मोठा अशा प्रकारचा कार्यक्रम ठरला आहे. पहेल मार्गे एलपीजी अनुदानाचे सुमारे २९००० कोटी थेट लोकांच्या खात्यात जमा केले गेले.
-राजकोषीय समायोजन (fiscal consolidation) करत राहण्यावर भर दिला पाहिजे. यात महसूल वाढवणे व खर्चाचे तार्कीकीकरण करणे यांचा समावेश होतो. ...............
वाचक प्रश्न
लोकसेवा आयोग पदांच्या किती प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी बोलवतात?
- सिद्धी भोसले
लोकसेवा आयोगाच्या धोरणाप्रमाणे पदांच्या कमाल तीन पट उमेदवार मुलाखतीसाठी बोलविता येतात. (म्हणजेच १:३ प्रमाणात)
................
- भूषण देशमुख
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
mata.upsc@gmail.com