अ‍ॅपशहर

लाखांचा पोशिंदा

स्पर्धा परीक्षा देऊन मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या स्पर्धा परीक्षा देऊन मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवारांमध्ये शेतकरी कुटुंबातील उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय असते. काही शेती पदवीधर असतात. खरे सांगायचे तर सर्वांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेती व ग्रामीण भाग यांच्याशी संबंध असतोच.

Maharashtra Times 11 May 2017, 4:38 am
स्पर्धा परीक्षा देऊन मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या स्पर्धा परीक्षा देऊन मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवारांमध्ये शेतकरी कुटुंबातील उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय असते. काही शेती पदवीधर असतात. खरे सांगायचे तर सर्वांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेती व ग्रामीण भाग यांच्याशी संबंध असतोच.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम world of farmers
लाखांचा पोशिंदा


बळीराजाचे जग

घरची शेती असेल तर सखोल माहिती घ्यायला हवी. मी त्यात लक्ष घालत नाही व त्यामुळे मला फारशी माहिती नाही, हे समर्थन लंगडे आहे. तुम्ही शेतकरी समाजातून आला आहात हा एक मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो. पण आपण शेतकऱ्यांच्या भावनांशी एकरूप झालो आहोत हे दाखवून देता आले पाहिजे. शेती व ग्रामीण पार्श्वभूमीतून प्रशासनात येणे हे एक सामर्थ्यस्थळ आहे, मर्मस्थान नव्हे. अशा उमेदवारांकडे समस्यांकडे बघण्याचा जास्त वास्तववादी दृष्टिकोन असू शकतो.

बेगडी जवळीक नको

पार्श्वभूमी असूनही जर उमेदवार त्या प्रश्नांवर चर्चा करायला नाखूष असेल किंवा त्याची माहिती उथळ असेल तर याचा नकारात्मक ठसा पॅनलवर उमटतो. उदा. अनेक उमेदवार आपल्या कुटुंबाचे शेतीतून मिळणारे उत्पन्न अगदी नाममात्र दाखवतात. तसे ते असेलही. पण मग काही पूरक प्रश्न तयार होतात. तुमचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली मोडते का? दारिद्र्यरेषा कशी ठरवतात? तुमच्याकडे कोणते रेशनकार्ड आहे? या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली तरच तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायात पुरेसा रस घेता असे सिद्ध होईल.

संगती

उमेदवाराच्या उत्तरात संगती असणे अपेक्षित आहे. मी आदिवासींमध्ये जाऊन शाश्वत शेतीचा प्रसार करतो, असे सांगून मग आमच्या घरच्या शेतीत आम्ही ऊस घेतो हे विसंगतीचे उदाहरण आहे. शेतीव्यवसायाला बाजार खुले झाले पाहिजे असे म्हणून नंतर देशांतर्गत महागाई आटोक्यात आणण्यासाठी शेतमालाच्या निर्यातीवर बंधने आणली पाहिजेत असे म्हणणे ही विसंगती ठरेल. शेतीतून पुरेसा नफा मिळाला पाहिजे असे म्हणतानाच शेती उत्पन्नावर कर लावण्यास सहमती दर्शवावी लागेल.

प्रश्नांचा मागोवा

तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का? तुमचे पीक फसल बीमा योजनेखाली आले आहे का?

तुम्ही कोणती पिके घेता? त्यासाठी किती गोणी खते वापरता? तुम्ही तुमच्या मालाची विक्री कशी करता?

ई-नाम, पाळीव प्राणी अभियान, सूक्ष्म सिंचन अभियान यांची माहिती.

जलव्यवस्थापन तंत्रे उदा. गोकुळ, वनराई बंधारे, शिरपूर पॅटर्न, शेततळी, जलयुक्त शिवार योजना. राजस्थानातील जोहड किंवा आपल्याकडील शिवकालीन पाणी साठवण योजना.

‘उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला किंमत’ हा तर्क तुम्हाला मान्य आहे का?

शेती ही संस्कृती आहे की व्यवसाय आहे?

अॅग्रो-क्लायमॅटिक झोन काय असतात? भारतात ते किती आहेत? त्यानुसार आपल्याकडे पीक पद्धती आहे का?

शेतीमध्ये जैव-तंत्रज्ञानाला कितपत वाव दिला पाहिजे? सेंद्रिय शेताला प्रोत्साहन दिले पाहिजे की असेंद्रिय शेतीला?

शेतीला अनुदानांची गरज आहे का? शेती स्वबळावर टिकू शकत नाही का?

शेतीला कर्जमाफी दिली पाहिजे का? त्याची उद्योगांना दिलेल्या कर्जमाफीशी तुलना करा.

भारतात आपण कंपन्यांकडून शेती (कॉर्पोरेट फार्मिंग) करायला परवानगी द्यायला हवी का?

भारतीय शेतीचे खासगीकरण करायची गरज आहे का?

शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या केल्या तर त्याचा शेतीला फायदा होईल की तोटा?

शेतीसाठी अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची गरज आहे का?

कराराची शेती व शेतजमीन भाडेपट्ट्याने देणे (लँड लिजिंग) यात काय फरक आहे?

शेतीचे यांत्रिकीकरण करायची गरज आहे का? त्यामुळे बेरोजगारी वाढेल का?

उदारीकरणाचा शेती व्यवसायाला फायदा झाला आहे की तोटा?

‘यशाचा मटा मार्ग’ आता मटा मोबाइल अॅपवरही वाचा.

‘यशाचा मटा मार्ग’मधील सर्व लेख एकत्र वाचा

www.mtonline.in/ymm वर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज