अ‍ॅपशहर

गतिरोधकातील त्रुटीमुळे अपघात

Maharashtra Times 21 Feb 2017, 11:11 am
नगर : औरंगाबाद रोडवर सोमवारी सकाळी एक अपघात झाला. पुढे जाणाऱ्या ट्रकवर पाठीमागून आलेल्या टेम्पो धडकला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले. हा अपघात गतिरोधकातील त्रुटीमुळे झाला. गतिरोधकाची रचना अशी आहे, की तेथे वाहन पूर्णपणे थांबवावे लागते. शिवाय गतिरोधकाची सूचना देणारे फलक नाहीत. पाठीमागून आलेल्या वाहनचालकाला गतिरोधकावर अचानकपणे थांबलेल्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येते. महामार्गावरील गतिरोधक यासंबंधी ठरवून दिलेल्या निकषानुसार होण्याची गरज आहे. अपघात होऊ नयेत म्हणून बसविण्यात आलेले गतिरोधकच सदोष असतील तर तेच अपघाताचे कारण बनत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accidents
गतिरोधकातील त्रुटीमुळे अपघात


- विजय मते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज