अ‍ॅपशहर

रात्री नऊनंतर कोंडी

Maharashtra Times 28 Nov 2016, 11:49 am
नगर : सायंकाळी शहरातून अवजड वाहनांना बंदी असते. रात्री बंदीची मुदत संपताच जड वाहने एकदम शहरात येतात. त्यामुळे औरंगाबाद रोडवर रात्री नऊच्या सुमारास दररोज कोंडी होते. एसीपी चौक ते कोठला चौकापर्यंत वाहतूक दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प होते. एसपी चौकाच्यापुढे मनमाड आणि औरंगाबाद या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक एकत्र येते. तर दुसरीकडे कोठला चौकातील बेशिस्त आणि स्थानिक वाहनांमुळे कोंडीत भर पडते. वाहतूक पोलिस तेथे गेले तरी त्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे जड वाहने एकदम न सोडता टप्याटप्प्याने सोडण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after nine nights traffic congestion
रात्री नऊनंतर कोंडी


- जाकीर शेख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज