सध्या सणउत्सवाला सुरूवात झाली आहे. आता दिवाळी सण येतोय. अनेक संस्था आणि प्रशासन फटाके मुक्त दिवाळी व्हावी म्हणून जनजागृती करताना दिसतात. परंतु त्याचा उपयोग होतोच असे नाही. इतर सणासुदीला प्रशासन काही हरकती घेत नाही मग दिवाळीच्या सणउत्सवाला का घेते हे समजत नाही. दिवाळी प्रदुषण मुक्त झाली पाहिजे या मताशी सर्व सहमत आहेतच. पण लहान मुलांचे आनंदावर विरजण का घातले जाते हा पण एक प्रश्न निर्माण झाला आहे. फटाके विक्री करणारे लोकांवर अनेक कुटुंब अवलंबित आहेत. खुप मोठ्या प्रमाणात अर्थिक उलाढाल होते. पण दिवाळीला फटाके नाही उडवणार तर कधी उडवायचे . दिवाळी प्रदुषण मुक्त होण्यासाठी लहान लहान फटाके घ्यायला हरकत नसावी. तसेच कमी आवाज असणारे फटाके, लाईटीग, दिवे, पणत्या इत्यादीचा वापर व्हायला हवा. खरं तर दिवाळी हा दिव्यांचा सण असल्यामुळे तो तसाच साजरा केला पाहिजे. फटाक्यांचे आवाजानाने ध्वनी प्रदुषण पण होते. काही ठिकाणी पेशंटला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबी टाळून दिवाळी साजरी करावी. फटाके उडविताना कुणी जखमी होणार नाही याची काळजी घ्यावी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
जनजागृती चा काही प्रमाणात उपयोग होतो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 5:44 am