नगर : बायपास रस्ता खराब झाल्याने नगर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीची नेहमी चर्चा होते. मात्र, शहरातही अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल भरून गल्लीबोळातून धावत असतात. याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होते. लहान टेम्पोमध्ये अधिक माल भरून नेला जाण्याचे असे प्रकार शहरात नेहमी पहायला मिळतात. हा प्रकार संबंधित वाहन आणि अन्य वाहनांसाठी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकतो. शिवाय वाहतुकीची कोंडीही होत आहे. वाहतूक पोलिस आणि आरटीओने अशा वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे.- दिनेश कुलकर्णी
अशीही अवजड वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2017, 5:30 am