देखभाल समिती हवीमहाराष्ट्रातील जुन्या झालेल्या पुलांची दुरुस्ती वेळेवर होत नाही. या पुलांच्या स्थितीची माहिती सरकारकडे असते. मात्र, दुरूस्तीचे काम प्रभावीपणे होत नाही. त्यासाठी एक कायमस्वरूपी समिती हवी. प्रत्येक शहरातील पुलांच्या बाबतीत या समितीने नियमितपणे पाहणी करून अहवाल दिला पाहिजे. संबंधित सरकारी यंत्रणेला याची माहिती देण्याचे काम समितीने केले पाहिजे. याशिवाय दुरूस्तीच्या कामावरही ही समिती लक्ष ठेवेल. उदा. नगरमधील जुन्या रेल्वे पुलाची दुरूस्ती झाली खरी पण कामाच्या दर्जाबद्दल शंका आहेत. दुरूस्तीनंतरही पूल मजबुत होणार नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही.-अबुजर सय्यद
देखभाल समिती हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2019, 5:39 am