बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना काही मुले सापडतात. मुळात ज्या केंद्रावर कॉपीकेसचे प्रमाण जास्त आहे, तेथील केंद्रप्रमुखाला जबाबदार धरण्याची आवश्यकता आहे. तसेच भरारी पथकांनी सुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्रावर जाणे गरजेचे आहे. सातत्याने भरारी पथकांनी तपासणी केल्यास, नक्कीच कॉपी करण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. तसेच भरारी पथकांसोबत सुरक्षारक्षक सुद्धा असणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करताना कोणतीही भिती राहणार नाही. - दिनेश कुलकर्णी
सातत्याने भरारी पथकांनी तपासणी करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Mar 2020, 5:45 am