नगर : सिद्धार्तनगर भागात लहान मुलांसाठी बालभवन बांधण्यात आलेले आहे. मात्र, त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. लोखंडी खिडक्या तुटल्या आहेत. संरक्षक भिंत पडली आहे. तेथे येणाऱ्या मुलांची निराशा तर होतेच शिवाय सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी वास्तू किंवा ठिकाणी दुर्लक्षित राहिले तर ते कायमचे खराब होऊन जाते, अशी अनेक उदाहरणे नगर शहरात आहेत. त्यामुळे महापालिकेने या बालभवनकडे वेळीच लक्ष द्यावे आणि दुरूस्ती करावी.- संतोष उमाप
बालभवनची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2017, 5:36 am