जानेवारी महिन्यात सुरक्षितता सप्ताह राबविण्यात येत आहे. पोलिस स्थापनादिनाच्या निमित्ताने सुद्धा रस्ता वाहतूक नियमाचे बाबतीत जनजागृती केली जाते. वाहतूक नियम पाळले, तर अपघात होणार नाहीत, वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत जनजागृती केली जाते. नागरिक याचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाही. हेल्मेट घालत नाहीत. सिग्नल पाळत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. परंतु जनजागृतीमुळे नागरिक सतर्क राहतात. नागरिकांनी सुद्धा याची काळजी घ्यावी. अर्थात जनजागृतीमुळे आणि विविध उपक्रमांची माहिती दिल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होईल. यामध्ये नागरिकांनी एकत्रित मिळून सहभागी होणे आवश्यक आहे.- अॅड.शिवाजी कराळे......
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2020, 5:45 am