एखादा अनुभव किंवा दुर्घटना आल्याशिवाय चांगले आणि वाईट यातील फरक कळत नाही. परंतु यात हकनाक गरिबांचाच बळी जातो, हा आजपर्यंतचा अनुभव. करोनासारख्या व्हायरसचा धोका वेळोवेळी वाढत असताना काही नागरिक यास खतपाणी घालताना दिसतात. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा एकमेव उपाय सुरक्षित अंतर ठेवणे व गर्दी टाळणे, यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. परंतु त्यानंतरही नागरिक गर्दी करताना दिसतात. सध्या प्रशासन जे काम करीत आहे, तेच काम घरातील, रक्ताच्या नात्यातील किंवा इतर कोणीही करणार नाही, याची नागरिकांनी देखील जाणीव ठेवावी. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळत प्रशासनाला सहकार्य करावे. - शहाजान शेख
नागरिकांनी जाणीव ठेवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 5:45 am