स्वच्छता व महापालिका हे दोन्ही ताळमेळ नसणारे शब्द आहेत. शहर स्वच्छ राहावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणेवर कोणाचेही नियंत्रण नाही. अनेक ठिकाणचा कचरा हा तर दोन-दोन दिवस उचलला जात नाही. शहरामध्ये निर्माण झालेली अस्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी सर्वात प्रथम प्रत्येक वार्डामध्ये नागरिकांचे किमान पाच स्वच्छता निरीक्षक गट तयार करावेत. या गटाच्या सल्ल्याने त्या भागातील स्वच्छता कर्मचारी, ठेकेदार यांना काम करण्याबाबत सूचना द्याव्यात. अस्वच्छतेची समस्या सुटण्यासाठी जो पर्यंत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग नसेल, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही, व स्वच्छता मोहीम ही केवळ दिखावाच ठरेल.- डॉ.फहिम सय्यद
नागरिकांचा सहभाग हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2019, 5:43 am