पिंपळगाव उज्जैननगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैन या गावात स्वच्छ भारत योजनेची अंमलबाजवणी सुरू असून घरोघरी शौचालये बांधली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सध्याही गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उघड्यावर जात आहेत. अनेकांनी शौचालय बांधलेले असले तरीही त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे या गावात हे अभियान कागदावरच राहिले असून त्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे.- ज्ञानेश्वर वाघ
स्वच्छ भारत कागदावरच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2017, 5:32 am