लोकांचे जीव वाचवण्याचे उपाय लॉकडाउन सुरू झाल्यापासून सुरू आहेत. घरी बसणे आणि सार्वजनिक ठिकाणी आजिबात गर्दी न करणे, याचा योग्य तो चांगला परिणाम अनेक शहरात पाहायला मिळतो आहे. नवीन रुग्ण संख्या कमी होऊन बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होत आहेत. आता अर्थव्यवस्था सुरू होण्यासाठी ज्या शहरात बाधित रुग्णांचा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशा शहरात ठराविक वेळेत सर्व प्रकारचे व्यापार सुरू करावेत. अर्थात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक असणारी नियमावली त्यासाठी पाळणे सक्तीचे करण्यात यावे. सर्व प्रकारचे उद्योग धंदे सुरू झाल्याने स्थानिक मजूर वर्गाची रोजी रोटी सुरू होईल, व बाजारात चलन फिरू लागेल. वाहतूक व्यवस्था जिल्हा अंतर्गत सुरू झाली की, अनेक प्रश्न मार्गी लागतील. मात्र स्वयंशिस्त पाळली आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले, तर हा दुसरा प्रयोग सुद्धा पूर्णपणे यशस्वी होईल. - दिनेश कुलकर्णी.....
स्वयंशिस्त पाळत प्रशासनाला सहकार्य करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2020, 5:30 am