सावेडीउपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात सकाळी झालेल्या किरकोळ पावसामुळेही पाणी साठले. पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे पाणी चौकातील खोलगट भागातच साचून राहते. येथील रस्त्याची रचनाच चुकीची झाली आहे. पाणी साठल्याने वाहनचालक, पायी जाणारे नागरीक आणि दुकानदारांचेही हाल झाले. किरकोळ पावसातच ही परिस्थिती उद्भवली असल्याने मोठ्या पावसात जास्त हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकातील पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.- मनोहर गोसावी
पाण्याचा निचरा करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2017, 5:32 am