नगर शहरात सध्या स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषतः प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. नगर शहर स्वच्छ झाले पाहिजे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. कचरागाड्या उपलब्ध आहेत, पण नागरिक त्याचा उपयोग कमी प्रमाणात करताना दिसतात. आजही प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण नाही. खुप प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. हे थांबवण्यासाठी महापालिकेने कचरा व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात काय हरकत आहे. जर सगळ्यांनीच एकत्रित मिळून काम केले, तर निश्चितच नगर शहर स्वच्छ व सुंदर होईल. सफाई कर्मचारीने सुद्धा चांगले काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे निश्चितच नागरिकांना समाधान मिळेल.- अॅड.शिवाजी कराळे.....
सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 5:45 am