नगर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात पोलिसांचा पुढाकार पाहिजेच. त्याशिवाय अपघात थांबणार नाहीत. तसेच अनेक दुचाकीस्वार अत्यंत बेधडकपणे वाहने चालवतात, पार्किंग करतात. फक्त शहरातील वाहने कायम नीट लावली, तरी अनेक समस्या सुटणार आहेत. वाहतूक पोलिस हे देखील कायमस्वरुपी मोठे चौक आणि बाहेर जाणारे महामार्ग येथे थांबले तर बेशिस्त वाहनचालक यांना शिस्त लागेलच. शिवाय अवजड वाहनांचा शहरात होणारा प्रवेश रोखता येईल. - दिनेश कुलकर्णी
बेशिस्त वाहनचालकांना शिस्त हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2020, 5:45 am