शाळा-महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या टपऱ्या टाकण्यास परवानगी देऊ नये. कारण अशा टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री सुरू असते. मुळात गुटखा, तंबाखू यांची विक्री थांबली तरच आपोआप ते खाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करून वचक निर्माण करावा. जेणेकरून नियम मोडण्याचे धाडस कोणी करणार नाही. तसेच सर्व कॉलेजांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाल्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत सातत्याने जनजागृती करण्याची गरज आहे. जेणेकरून तंबाखूजन्य पदार्थ्यांकडे वळण्याचे तरुणांचे प्रमाण कमी होईल. - सुरेश जेजुरकर.....
जनजागृतीवर भर द्यावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2019, 5:40 am