नगर शहरासह सावेडी, केडगाव उपनगर आणि महामार्ग सगळीकडे खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिका हा विषय गांभिर्याने घ्यायला तयार नाही. याविरुद्ध जन आंदोलन झालेच नाही, त्यामुळे मतदार नगरकर सुद्धा महापालिका एवढेच जबाबदार आहेत. एखाद्या भागामध्ये उभा राहून विकासाची कामे करून घेणारे नगरसेवक हे दृश्य दिसतच नाही. खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यातच बेफाम दुचाकी चालकांना वाहने नियंत्रित होत नाहीत, व रात्रीच्या अंधारात खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे सुद्धा अपघात होत आहेत. खड्डेमुक्त रस्ते होण्यासाठी सर्व नगरसेवकांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास, ही समस्या नक्कीच सुटू शकेल.- दिनेश कुलकर्णी.....
सातत्याने पाठपुरावा हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2019, 5:42 am