बोल्हेगाव फाटानगर-मनमाड महामार्गावर बोल्हेगाव फाटा येथे प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्त्याची जणू चाळणच झाली आहे. महामार्ग असूनही त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले जात नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणी साठून राहते. रस्त्यावर खड्डे पडतात आणि वाहनांमुळे ते मोठे होत जातात. अशा रस्त्यावरून वाहनचालकाना कसरत करीत वाहने चालवावी लागतात. संबंधित यंत्रणांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे.- शुभम मरकड
महामार्गाची चाळण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2017, 5:39 am