सूचना फलकाकडे दुर्लक्षनगर : स्वच्छतेसंबंधी नागरिकांच्या सवयी किती चुकीच्या आहेत, हे या छायाचित्रावरून लक्षात येते. येथे कचरा टाकू नये, अशी स्पष्ट सूचना लिहिलेल्या ठिकाणाही कचरा टाकला जातो. बुऱ्हाणनगर, कापूरवाडी परीसरात अशा फलकाजवळच कचरा टाकण्यात आला आहे. स्वच्छता राखण्याची जबाबदारी नागरिक आणि प्रशासन या दोघांचीही आहे. कचरा टाकू नये, असा फलक लावताना कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागाही उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- अरविंद मुनगेल
सूचना फलकाकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2017, 5:36 am