नगर : काटवण खंडोबा भागात पाईपलाइनचे काम सुरू आहे. मात्र हे काम खूपच संथगतीने सुरू आहे. त्यासाठी केलेले खोदकाम नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहे. खोदकामाचा रस्त्यावर अडथळा येत आहे. चांगल्या कामामुळे नागरिकांना विरोध केला नाही, मात्र काम रखडल्याने आणखी किती दिवस त्रास सहन करायचा असा प्रश्न पडला आहे. संबंधित यंत्रणांनी हे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची त्रासातून सुटका करावी.- मंगेश दातरंगे
कामाची गती वाढवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2017, 5:36 am