दुभाजक तोडून रस्ते तयार करणे बेकायदेशीर आहे. पण शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सर्रास वाहतूक वळवण्यासाठी दुभाजक तोडले जात आहेत. वाहतूक नियमन आपल्याकडे योग्य होण गरजेचे आहे. बऱ्याचवेळा महामार्गावरील दुभाजकाची देखभाल होत नाही. या दुभाजकांची सफाई, दुरुस्ती व रंगरंगोटी वेळेवर झाल्यास हे प्रकार थांबतील. तसेच शहरातील काही मार्गांवर दुभाजक असुनही पायी जाणारे नागरिक दुभाजकांवरून उडी मारत रस्ता ओलांडतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्याची आवश्यकता आहे. दुभाजक तोडणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करताना महापालिकेने त्यांचे व्यावसायिक परवाने रद्द करावे व दुभाजक नुकसानभरपाई वसूल करावी.- डॉ. फईम सय्यद
लोखंडी जाळ्या लावाव्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2020, 5:44 am