‘करोना’ग्रस्तांची संख्या वाढत आहे. परंतु लॉकडाउनमुळे जनता हतबल झाली आहे. ज्यांचे हातावर पोट आहेत, त्या लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था आणि सरकार मदत करीत आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता लॉकडाउनचा कालावधी वाढवला गेला आहे. परंतु नागरिकांनी जर प्रशासनाला सहकार्य केले, तर टप्याटप्याने लॉकडाउन मागे घेतला जाऊ शकतो. सध्या नागरिकांचा जीव वाचवणे, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे, व त्यामध्ये काही गैर नाही. जर खरचं आवश्यक असेल तर सर्व उपाययोजना करूनच लॉकडाउन वाढवायला हरकत नाही. परंतु परिस्थिती आटोक्यात येत असेल तर लॉकडाउन मागे घ्यावा. पण नागरिकांनी सुद्धा प्रशासनाचे आदेश पाळणे गरजेचे आहे.- अॅड.शिवाजी कराळे
प्रशासनाचे आदेश पाळणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2020, 5:30 am